HW News Marathi
देश / विदेश

जवानांना मोबाईलमधून ८९ अ‍ॅप्स तात्काळ काढून टाकण्याचे लष्कराचे आदेश

नवी दिल्ली | चीन आणि भारतातील वाढता तणाव आणि गोपनीय माहितीच्या सुरक्षेवरुन प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याने भारतीय लष्कराने जवानांना मोबाइलमधून ८९ अ‍ॅप्स तात्काळ काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत.भारतीय लष्कराकडून यासंबंधी आदेश प्रसिद्ध करण्यात आला असून यामध्ये टिकटॉक, फेसबुक, इन्स्टाग्राम तसंच पबजीचाही समावेश आहे.

भारतीय लष्करातील अधिकारी आणि जवानांच्या फोनमधून राष्ट्रीय सुरक्षेसंबंधी संवेदनशील आणि गोपनीय माहिती चोरी होण्याची शक्यता असल्याने हा आदेश देण्यात आला आहे. लष्कराने टिंडरसारखे अ‍ॅपदेखील डिलीट करण्यास सांगितले आहे. याशिवाय काऊचसर्फिंग आणि बातम्यांसाठी वापरले जाणारे डेलीहंट हे अ‍ॅपही डिलीट करण्यास सांगण्यात आले आहे.

१५ जुलैपर्यंत अ‍ॅप्स काढून टाकावीत असे निर्देश भारतीय लष्कराकडून अधिकारी, जवानांना देण्यात आले आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला असून, आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा लष्कराने दिला आहे. याआधी भारत सरकारने टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदीचा निर्णय जाहीर केला होता.

दरम्यान भारतीय लष्कराने सोशल मीडिया वापरण्यासाठी मात्र मुभा दिली आहे. व्हॉट्सअ‍ॅप, टेलीग्राम, सिग्नल, युट्यूब, ट्विटर यांचा वापर करण्यासाठी अधिकारी आणि जवानांना परवानगी आहे. मात्र या ठिकाणी आपल्या लष्करामधील सेवेसंबधी माहिती उघड करु नये अशी अट घालण्यात आली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनंतनागमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk

कमांडर अभिलाष यांना सुखरूपपणे वाचविण्यात यश

Gauri Tilekar

उत्तरप्रदेशपाठोपाठ छत्तीसगडमध्ये ऑक्सिजन पुरवठा खंडीत होऊन बालके दगावली

News Desk