HW News Marathi
देश / विदेश

श्रीनगरमधील पोलीस चौकीत दहशतवादी हल्ला

जम्मू-कश्मीर | ज्येष्ठ पत्रकार आणि रायझिंग काश्मीरचे संपादक सुजात बुखारी यांच्यावर गुरुवारी दहशवाद्यांनी हल्ला करुन त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. ही घटना ताजी असतानाच आज श्रीनगरमधील पोलीस चौकीवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे.

या हल्ल्यात एक पोलीस अधिकाऱ्यांसह एक हवालदार जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी कडक बंदोबस्त केला असून हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यात येत आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#Article370Abolished : पाकिस्तानचा जळफळाट, भारताविरोधात घेतले ३ मोठे निर्णय

News Desk

अपक्ष उमेदवार उत्पल पर्रिकर यांचा पराभव, तर भाजपचे बाबूश मोन्सेरात यांचा विजय

Aprna

भाजपश्रेष्ठींनी आदेश दिल्यानंतर अवघ्या २४ तासांत कमलनाथ सरकार पाडू !

News Desk
महाराष्ट्र

सरकार अत्याचार करणाऱ्यांवर कारवाई करत नाही | प्रकाश आंबेडकर

News Desk

मुंबई | जळगावातील जामनेरमध्ये मातंग समाजातील दोन मुले विहिरी पोहण्यासाठी गेले होते. म्हणून या मुलांना नग्न करुन मारहाण करण्यात आली आहे. आणि मारहाण केल्यानंतर त्यांची धिंड देखील काढण्यात आली. या प्रकरणाचा निषेध व्यक्त करत भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सरकार अत्याचार करणाऱ्यांवर कावाई न करता केवळ घडलेली घटना पाहत बसते, अशा गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर केला आहे.

त्यामुळे तुम्ही अत्याचार करा, तुम्हाला काही होणार नाही, असा संदेश समाजात जात असल्याचे देखील आंबेडकरांनी म्हटले आहे. तसेच या घटनेनंतर पीडितांच्या कुटुंबावर गुन्हा मागे घेण्यासाठी सातत्याने दबाव आणला जात आहे. या प्रकरणावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी. या प्रकरणाची सुनावणी जलद न्यायालयात होणे, गरजेचे असल्याचे देखील आंबेडकरांनी सांगितले आहे. यानंतर जनतेत योग्य संदेश दिला जाईल, असे देखील आंबेडकर म्हटले आहे. या पीडित कुटुंब्यांची प्रकाश आंबेडकर भेट घेणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण, गुजरातचे सामाजिक कार्यकर्ते आणि दलित समाजाचे तरुन नेते जिग्नेश मेवाणी, रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आदी नेते मंडळीनी या प्रकरणाची दखल घऊन यांचा निषेध व्यक्त करत सरकारवर टीका केली आहे.

 

Related posts

रेस्टोरंट, मंदिरे पुन्हा सुरु करण्याबाबत चर्चा, मात्र लोकल रुळावर येण्यास वाट पाहावी लागणार

News Desk

“इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब…”,अमृता फडणवीसांचा शायरीतून सरकारला टोला

News Desk

‘मी यशवंतराव चव्हाण यांची पुस्तकंही वाचली’, राज ठाकरेंचा शरद पवारांना टोला!

News Desk