HW News Marathi
देश / विदेश

#PulwamaAttack : ‘सर्जिकल स्ट्राइक’ पुढे जाऊन सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे !

मुंबई | पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कडव्या शब्दांमध्ये निषेध केला आहे. पाकिस्तानला सोडणार नाही, असे नुसतेच बोलू नका. प्रत्यक्ष कारवाई करा. ‘सर्जिकल स्ट्राइक’च्याही पुढे जाऊन पाकिस्तानला चांगलाच धडा शिकविला पाहिजे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. तसेच पुढे ठाकरे असे देखील म्हणाले की, ‘या विषयाचा सोक्षमोक्ष लावलाच पाहिजे. सगळे जग आपल्यापाठीशी आहे. तेव्हा हिच वेळ आहे पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना धडा शिकवण्याची गरज आहे.

गुप्तचर विभाकडून माहिती मिळूनही आपण त्याकडे लक्ष देत नसू तर त्यांची चौकशी झाली पाहिजे. ज्यांच्या हातात सूत्र आहेत. ती लोके करतात काय? त्यांना त्यांच्या जागेचे महत्व कळत नसेल तर त्यांना आता जागेवर उठवा, त्यांना हटवले पाहिजे, अशा शब्दात ठाकरेंनी खडे बोल सुनावले. दरवेळी आपण केवळ घोषणा, दंड थोपटून दाखवतो, पण कधी पाच वर्ष होऊन गेली. कारण शांत बसणे म्हणजे मर्दानगी नाही, असेही ते म्हणाले.

शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पालम विमानतळावर जाऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. २०१६ मध्ये भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केला होता. या कारवाईदरम्यान भारतीय सैन्याने दहशतवाद्यांचा खात्मा करत त्यांचे लॉन्चिंग पॅड्स उद्ध्वस्त केले होते. याचा संदर्भ देत उद्धव यांनी त्यापेक्षाही कठोर कारवाईची मागणी केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Union Budget 2021 | या ‘४’ राज्यांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पातून बंपर घोषणा!

News Desk

अटलजींना आहेत हे आजार…

News Desk

नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांची प्रगती! – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

Manasi Devkar