HW News Marathi
देश / विदेश

#Amritsar : मृतांच्या परिवाराला ५ लाख रुपये सांत्वनपर मदत द्या !

मुंबई । “अमृतसरमध्ये झालेल्या रेल्वे अपघातातील मृतांच्या परिवाराला ५ लाख रुपये सांत्वनपर आर्थिक मदत त्वरित देण्यात यावेत”,अशी मागणी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. रावण दहनाचा कार्यक्रम बघत असणाऱ्या लोकांच्या गर्दीवर ट्रेन आली रेल्वेखाली ६१ हुन अधिक लोक ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. अत्यंत भयानक घटना पंजाबच्या अमृतसरमध्ये घडली आहे. ‘मोठया प्रमाणात जीवित हानी झाल्याबद्दल रामदास आठवले यांनी शोकभावना व्यक्त केली आहे. तसेच मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे ‘रामदास आठवले यांनी कळविले आहे.

काय आहे ही घटना

अमृतसर येथे (१९ ऑक्टोबर) रावणदहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी रावणदहन होत असताना पेटलेला पुतळा एका बाजूला झुकल्यामुळे तो उपस्थितांच्या अंगावर पडेल अशी भीती निर्माण झाली होती. दरम्यान, या अपघातातून वाचण्यासाठी उपस्थित लोकांनी घटनास्थळावरून आजूबाजूच्या परिसरात धाव घेतली. रावणदहन होत असलेल्या जागेच्या बाजूला रेल्वेचे रूळ असल्यामुळे घाईने धावत असलेले लोक रेल्वेच्या रुळांवर आले. भरधाव वेगाने येत असलेल्या रेल्वेने अचानक रुळावर असलेल्या लोकांच्या जमावाला धडक दिली. सदर घटनेत ६१ हुन अधिक मृत्यमुखी पडले आहेत आणि ७२ जखमी आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दिल्लीतील कृषी कायद्यांविरोधातील काँग्रेसचं आंदोलन पेटलं, प्रियांका गांधींना घेतलं ताब्यात

News Desk

राम विलास पासवान यांचे निधन म्हणजे माझे वैयक्तिक नुकसान – पंतप्रधान

News Desk

माझे नाव राहुल सावरकर नाही, तर राहुल गांधी आहे !

News Desk