HW News Marathi
देश / विदेश

#Amritsar : लोकांचा उद्रेक, पोलिसांवर केली दगडफेक

अमृतसर | दसऱ्याच्या दिवशी अमृतसर येथे रावण दहन पाहणाऱ्यांना रेल्वेने चिरडले या अपघातात मृतांचा आकडा ७० तर १५० हून जास्त लोक जखमी झाला आहे. काही लोक कायमची अपंग झाली आहेत. हा अपघात रेल्वेच्या चुकीमुळे झाले असा आरोप जनता करीत आहे. अमृतसर जवळील चौडा बाजारात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. संतापामुळे अपघाताच्या ठिकाणी लोकांनी रेल रोको आंदोलन केले होते. लोकांनी रेल रेल्वे आंदोलन करून रेल्वे अडवून पोलिसांवर दगडफेक केली आहे. त्यात पोलिसांना जखमादेखील झाल्या आहेत. त्यानंतर पोलिसांनी आज मोठे सैन्य घेऊन जमावाला हटविले आणि रेल्वे मार्ग मोकळे केले आहेत. मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली आहे.

पंजाब सरकारने २८ दिवसांत अपघाताचे न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिसांनी हत्या व दुर्घटनेशी संबंधित कलमे लागू केली आहेत. दुसरीकडे या अपघातात रेल्वेची काहीच चूक नाही, त्यामुळे रेल्वे मोटरमनची चौकशी केली जाणार नाही, असे राज्य मंत्री मनोज सिन्हा यांनी स्पष्ट केले आहे. या मोठ्या दुर्घटनेनंतर घटनास्थळी उपस्थित लोकांमध्ये संतापाची लाट उसळली असल्याने अमृतसरच्या शिवालय रेल्वे क्रॉसिंगवर असलेल्या रेल्वेच्या केबिनची जनतेने तोडफोड केली आहे. केबिनमॅनला बाहेर फेकण्यात आले आहे. त्यामुळे केबिनमॅन जखमी झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीरमधील बडगाममध्ये जैश-ए-मोहम्मदच्या २ दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

‘सुप्रीम कोर्टाने मोदी सरकारला फटकारलं’, कारण…..

News Desk

हनीप्रीत-राम-रहीम जेलमध्ये येणार एकत्र ?

News Desk