HW News Marathi
राजकारण

अमृतसर रेल्वे अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची सांत्वनपर मदत द्या !

मुंबई | रावण दहनाचा कार्यक्रम बघत असलेल्या लोकांच्या गर्दीवर भरधाव ट्रेन आल्याने या रेल्वेखाली शंभरहुन अधिक लोक ठार झाल्याची अत्यंत भयानक घटना पंजाबच्या अमृतसर मध्ये घडली आहे. हा रेल्वे रुळांवर झालेला सर्वात मोठं अपघात असून या अपघाताची सखोल चौकशी करण्याची तथा या अपघाततील मृतांच्या परिवाराला 5 लाख रुपये सांत्वनपर आर्थिक मदत त्वरित देण्यात यावेत अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.

अमृतसर मधील रेल्वे अपघात अत्यंत दुःखद घटना आहे. मोठया प्रमाणात जीवित हानी झाल्याबद्दल रामदास आठवले यांनी तीव्र शोकभावना व्यक्त केली असून मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी असल्याचे ना रामदास आठवले यांनी कळविले आहे.

रावण दहन चा कार्यक्रम रेल्वे रुळांजवळ कोणतीही परवानगी न घेता आयोजित करण्यात आला . फटाक्यांच्या आतषबाजीत रेल्वे रुळांवर उपस्थित बघ्यांच्या गर्दीला रेल्वेचा आवाज आला नाही.त्यात शंभरहून अधिक जण मृत्युमुखी पडल्याची दुःखद घटना घडली आहे.या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना सरकारने 5 लाख रुपयांची सांत्वनपर मदत करण्याची मागणी रामदास आठवले यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

भाजप-शिवसेना युती मजबूत | उद्धव ठाकरे

News Desk

मी भीमा कोरेगावला जाणारच !

News Desk

#Article370Abolished : लोकसभेत आज कलम ३७० हटविणे आणि जम्मू काश्मीरचे विभाजनचा प्रस्ताव मांडणार

News Desk
मुंबई

उत्तर भारतीयांच्या मागे उद्धव ठाकरे खंबीरपणे उभे

News Desk

मुंबई | शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उत्तर भारतीयांच्या मागे खंबीरपणे पणे उभे आहेत असे वक्तव्य शिवसेना नेते आणि ठाणे जिल्ह्याचे पालक मंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. कांदिवली (पूर्व) ठाकूर व्हिलेज येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘उत्तर भारतीय सम्मान’ संमेलनात ते बोलत होते. आमदार प्रकाश सुर्वे यांनी या संमेलनाचे आयोजन केले होते. या संमेलनाला राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, एकनाथ शिंदे, उत्तर भारतीय महासंघाचे अध्यक्ष हेमंत पांडे, प्रभाग समिती अध्यक्ष शितल म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित राहिले होते. येत्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उत्तर भारतीय मतदारांना साद घालताना पहायला मिळत आहे.

कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबईत जेंव्हा उत्तर भारतीयांना मारपीठ झाली त्यावेळी, आमदार प्रकाश सुर्वे यांनी उत्तर भारतीयांच्या समर्थनार्थ रॅली काढली होती. शिवसेना पक्ष सदैव उत्तर भारतीयांच्या पाठीशी उभा आहे. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उत्तर भारतीयांच्या मागे खंबीरपणे पणे उभे असून अनेक उत्तर भारतीयांना शिवसेनेत महत्वाची पद देण्यात आल्याची आठवण सुद्धा शिंदे यांनी उपस्थित जनसमुदायाला यावेळी करून दिली.उत्तर भारतीय सम्मान’ संमेलनाला विशेष भोजपुरी रंगा रंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी भोजपुरी सुपरस्टार खेसारीलाल यादव आणि प्रसिद्ध अभिनेत्री रितू सिंह यांची विशेष उपस्थिती होती.

Related posts

बनावट किन्नर विरोधात कारवाई करा- किन्नर माय ट्रस्टची मागणी

News Desk

सिंधिया हाऊस इमारतीला आग

swarit

हा विजय वेगळाच – उद्धव ठाकरे

News Desk