HW News Marathi
देश / विदेश

अण्णा हजारेंचा मोदींवर संताप, म्हणाले मोदींना पदाचा अंहकार

सांगलीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मी आतापर्यंत तीस पत्रे पाठवली. परंतु त्यांनी त्याला केराची टोपली दाखवली आहे. त्यांनी एकाही पत्राचे अद्याप उत्तर दिलेले नाही. पंतप्रधान पदाची हवा त्यांच्या डोक्यात गेल्याने त्यांचा अंहकार वाढला आहे. अशी टीका ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली आहे. सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे जाहीर सभेत बोलताना अण्णा हजारे यांनी हे आरोप केले.

अण्णा हजारे मोदी सरकारविरोधात येत्या २३ मार्च पासून आंदोलन सुरू करणार आहेत. यावेळी अभूतपूर्व आंदोलन होईल, असा इशाराही त्यांनी दिला. देशात कृषीसंकट वाढते आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. रॅली आणि आंदोलन करून मतदार गोळा करायचे हा आपल्या आंदोलनाचा उद्देश नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही आंदोलन उभे राहिल याची मला खात्री आहे असेही अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. लोकपाल आंदोलनाचीही लढाई अद्याप संपलेली नाही. लोकपाल विधेयक लागू करणे, लोकायुक्तांची नियुक्ती करणे, शेतकऱ्यांसाठी प्रति महिना ५ हजार रूपये पेन्शन लागू करणे आणि शेतीमालाला चांगला दर मिळवून देणे या आपल्या महत्त्वाच्या मागण्या आहेत असेही अण्णा हजारेंनी सांगितले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी द्विपक्षीय चर्चेसाठी उत्साही | पंतप्रधान मोदी 

Gauri Tilekar

देशाची वाटचाल गुलामगिरीकडे- राहुल गांधी

News Desk

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, शिवसेना खासदारांची दिल्लीत घोषणाबाजी

News Desk