HW News Marathi
देश / विदेश

सोनिया गांधींच्या मतदार संघातील शेतकऱ्यांचा कर्जमाफीसाठी अर्ज

मुंबईः राज्य सरकारने महाराष्ट्रातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी लागु केलेली कर्माफी वादात सापडल्याचे अनेक उदाहरणे दिवसेंदिवस समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबई मोठ्या संख्येने शेतकरी असल्याचा जावइशोध अधिकाऱ्यांनी लावला होता. आता यात कहर केला असून उत्तर प्रेदश आणि मध्यप्रदेशातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी नोंद केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे सर्व शेतकरी उत्तरप्रेदशातील रायबरेली, लखनऊ, प्रतापगड भागातील आहेत. राज्याच्या आयटी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार गौतम यांनी ही माहिती दिली. कर्जमाफीची घोषणा झाल्यानंतर राज्यातून ४७ लाख ७५ हजार ९७ शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी नोंदणी केली आहे. त्यात मुंबईतील १४ हजार शेतकऱ्यांचा समावेश आहे. मुंबई शहरातून ९१७ आणि उपनगरातून १३ हजार २०४ शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. कर्जमाफीसाठी जळगावातून २.८६ लाख, अहमदनगरमधून २.४६ लाख, औरंगाबादमधून १.८० लाख आणि बीडमधून १.५९ लाख शेतकऱ्यांनी कर्जमाफीसाठी नोंदणी केली आहे. कर्जमाफीसाठी अर्ज करणाऱ्यांपैकी उत्तर प्रदेशातील लखनऊमधून दोन, रायबरेली आणि प्रतापगडमधून प्रत्येकी एका शेतकऱ्याने अर्ज केले आहेत. एवढेच नव्हे तर मध्यप्रदेशातूनही शेतकऱ्यांनी अर्ज केले आहेत. दरम्यान, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातील शेतकरी महाराष्ट्रात शेती करत असावेत आणि त्यांचं आधार कार्ड त्यांच्या राज्याचं असावं. मुंबईत राहणाऱ्या व्यक्तिची शेती गावाकडे असते आणि त्याचं आधार कार्ड मात्र मुंबईतील असतं तसाच हा प्रकार असावा असं प्रशासनाचं म्हणणं आहे

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज अनंतात विलीन, विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार

News Desk

ढगफुटीने सहा जणांना बळी

News Desk

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची तब्येत आणखी खालावली

News Desk