HW News Marathi
देश / विदेश

सैन्याला ६ महिने लागतील तर संघ ३ दिवसांमध्ये लढण्यासाठी तयार होईल – मोहन भागवत

मुंबई | भारतीय लष्कराला सैन्य उभारीणीसाठी ६ ते ७ महिने लागतात. मात्र संघाचे स्वयंसेवक अवघ्या ३ दिवसांमध्ये लढण्यासाठी तयार होतील’ असे वादग्रस्त वक्तव्य सरसंघाचालक मोहन भागवत यांनी केले. मुजफ्फरनगर येथील बिहार व झारखंडमधील कार्यकर्त्यांना संबोधिक करताना बोलत होते.

संघ लष्करी सेना नाही मात्र आमची शिस्त ही लष्करासारख्यीच आहे. मातृभूमीच्या रक्षणासाठी आमच्या संघाचे स्वयंसेवक बलिदानास तयार आहेत. ‘ भारत-चीन युद्धाच्या वेळी स्वयंसेवक सीमेवर पाय रोवून उभे राहिले. स्वयंसेवकांनी चीनच्या सैनिकांचा मुकाबला केला. स्वयंसेवकांनी जर मनात आणले तर आताही चीनच्या सैनिकांना भारतात घुसखोरी करणे कठीण होईल,’ असेही यावेळी भागवत यांनी सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

युद्धासाठी पुरेसा दारूगोळा कुठे आहे, कॅगच्या अहवालाने खळबळ

News Desk

#SushantSinghRajput : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर राजकीय नेत्यांनीही व्यक्त केली हळहळ

News Desk

विद्यार्थिनींचे आंघोळ करतानाचे व्हिडिओ व्हायरल; पंजाब महिला आयोगाने घेतली दखल

Aprna
महाराष्ट्र

सैन्यदलाच्या अवमानाबद्दल मोहन भागवत यांनी तात्काळ माफी मागावी : खा. अशोक चव्हाण

News Desk

नांदेड |भारतीय लष्कराला तयार व्हायला सहा-सात महिने लागतात पण संघ स्वयंसेवक तीन दिवसात सज्ज होतात असे वक्तव्य करून सरसंघचालक मोहन भागवत यांनी भारतीय लष्कराच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून सैन्याचा अवमान केला आहे. काँग्रेस पक्ष त्यांच्या वक्तव्याचा निषेध करित असून आपल्या वक्तव्याबद्दल त्यांनी तात्काळ सैन्यदलाची व देशाची माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

यासंदर्भात बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, ज्यावेळी भारतीय जवान आपल्या प्राणाची बाजी लावून जम्मू काश्मीरमधील सुंजवान येथे दहशतवाद्यांशी लढत होते. त्यावेळी मोहन भागवत यांनी लष्कराच्या अगोदर संघ स्वयंसेवक तयार होतील असे वक्तव्य केले. त्यांचे वक्तव्य लष्कराचे मानसिक खच्चीकरण व अवमान करणारे आहे. स्वातंत्र्य चळवळीत ब्रिटिशांविरोधीत लढण्याच्या वेळी माफी नामे लिहून देणारे.

ब्रिटिशांशी हातमिळवणी करून स्वातंत्र्य सैनिकांना पकडून देण्यासाठी मदत करणारे व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा करणारे आज देशाच्या सैनिकांच्या शौर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून स्वत:च्या बेगड्या देशभक्तीची ग्वाही देत आहेत, हा अत्यंत घृणास्पद प्रकार आहे असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

Related posts

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आता राज ठाकरे मैदानात; राज्य सरकारशी चर्चा करणार

News Desk

“अमरावतीची परिस्थिती नियंत्रित कशी ठेवायची यावर आमचं लक्ष”

News Desk

ठाकरे नाव लावून कोणी बाळासाहेब होत नाही नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका!

News Desk