HW News Marathi
देश / विदेश

अरुण जेटली यांची रिझर्व्ह बँकेवर टीका

नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी भारतीय रिझर्व्ह बँकेवर आज (मंगळवार) टीका केली आहे. यूपीए सरकारच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात कर्जे वाटण्याऱ्या बँकांवर मर्यादा आणण्यास रिझर्व्ह बँकेला अपयश आल्याचा आरोपही जेटली यांनी केला आहे. त्यामुळे आरबीआय आणि अर्थमंत्रालयामध्ये निर्माण झालेला तणाव आता चव्हाट्यावर आला आहे.

अमेरिका- भारत रणनिती भागिदारी मंचतर्फे आयोजित केलेल्या इंडिया लीडरशीप सम्मीटमध्ये अरुण जेटली बोलत होते. यूपीए सरकारच्या काळात एका वर्षात बँकाच्या कर्जे देण्याच्या प्रमाणात ३१ टक्क्यांनी वाढ झाली होती. २०१४ मध्ये आयकर रिटर्न भरण्याऱ्यांची संख्या ३.८ कोटी होती. गेल्या ४ वर्षात ही संख्या ६.८ कोटींवर पोहचली असल्याचे देखील अरुण जेटली यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आरबीआयचे डेप्युटी गर्व्हनर वीरल आचार्य यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा होण्यासाठी रिझर्व्ह बँकेला स्वातंत्र्य देण्याची गरज व्यक्त केली होती. याच केंद्रीय बँकांना स्वायत्तता देण्याच्या मुद्यावरून रिझर्व्ह बँक आणि अर्थमंत्रालयामध्ये तणाव निर्माण झाला आहे. यामुळेच एनपीए संकटाला रिझर्व्ह बँक जबाबदार असल्याचे अरुण जेटली यांनी म्हटले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज राष्ट्रीय ग्राहक दिन

News Desk

काँग्रेसची सरकार आल्यानंतर आम्ही तिहेरी तलाक कायदा रद्द करू !

News Desk

पंतप्रधान मोदींना यावर्षीचा सोल शांतता पुरस्कार जाहीर

Gauri Tilekar