HW News Marathi
देश / विदेश

अखेर आशीष मिश्राला अटक

लखीमपूर | उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे शेतकऱ्यांच्या आंदोलनात मोटारी घुसवून केलेल्या हिंसाचारप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष ऊर्फ मोनू याला शनिवारी रात्री अटक करण्यात आली.

हिंसाचारप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल

हिंसाचारप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल असलेला आशीष शनिवारी सकाळी १०.३० वाजता उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष चौकशी पथकापुढे हजर झाला होता. पोलीस उपमहानिरीक्षकांच्या नेतृत्वाखालील नऊ अधिकाऱ्यांच्या विशेष चौकशी पथकाने त्याची सुमारे ११ तास चौकशी केली. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली. हिंसाचारप्रकरणातील आरोपी आशीष याला अटक करण्यात आल्याची माहिती राज्य पोलिसांच्या विशेष चौकशी पथकाचे प्रमुख उपेंद्र अगरवाल यांनी दिली.

या प्रकरणाच्या सदोष हाताळणीवर सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर उत्तर प्रदेशातील भाजप सरकारवर दबाव वाढला होता. सर्वच विरोधी पक्षांनी आणि देशभरातील शेतकरी संघटनांनी आरोपी आशीषच्या अटकेची मागणी केली होती. अखेर तो शनिवारी सकाळी पोलिसांपुढे हजर झाला.

उत्तर प्रदेशमध्ये लखीमपूर खेरी येथे भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री यांच्या गाडीने शेतकऱ्यांना चिरडून मारले. याविरोधात महाविकास आघाडीच्या घटकपक्षांनी सोमवारी ‘महाराष्ट्र बंद’ पुकारला आहे. या बंदला सर्वच नागरिकांनी स्वत:हून पाठिंबा द्यावा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक, शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमित शहांना गृहमंत्री पदावरून हटवा, राष्ट्रपतींकडे सोनिया गांधींची मागणी

swarit

“उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी बनू शकतात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा”

News Desk

ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा राजीनामा

News Desk