HW News Marathi
देश / विदेश

‘हर बॅटलमें अटल’ अमूल कडून वाजपेयींना श्रद्धांजली

मुंबई | भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे काल निधन झाले. वाजपेयींच्या निधनाने देश शोकसागरात बुडाला आहे. देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. अमूल कंपनीतर्फे अटल बिहारी वाजपेयी यांना अनोखी आदरांजली वाहण्यात आली आहे. हर बॅटलमें अटल अशी पंच लाईन वापरत अमूलने अटलजींबाबतचा आदर व्यक्त केला आहे.

अमूल कंपनीतर्फे अशा काही प्रसंगांच्या वेळी कायमच पुढाकार घेऊन आणि प्रतिभाशक्तीचा वापर करून आदर व्यक्त करण्यात येतो. ती परंपरा अमूलने याही वेळी पाळली आहे. भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरूवारी एम्स रूग्णालयात निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर आज दिल्ली येथील स्मृती स्थळ या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी पंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे लोकप्रिय नेते अटल बिहारी वाजपेयी यांचे गुरुवारी संध्याकाळी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

अटलजींना अखेरचा निरोप देताना सगळा देश हळहळला. देशाला नवी दिशा देणारा बाप माणूस हरवल्याची भावना प्रत्येकाच्याच मनात होती. अंत्यसंस्कारांच्या आधी त्यांचे पार्थिव स्मृती स्थळ या ठिकाणी आणण्यात आले. त्यावेळी त्यांच्या पार्थिवाला लष्कराच्या तिन्ही दलांकडून सलामी देण्यात आली. तसेच राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक दिग्गजांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले आणि त्यावर पुष्पचक्र अर्पण केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मोठी बातमी ! १५० भारतीयांचं अपहरण!

News Desk

आंध्र प्रदेश एक्सप्रेसला आग, चार डब्यांना लागली भीषण आग

News Desk

देशातील काही राज्यांतील मुख्यमंत्र्यांची ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची विनंती

News Desk