HW News Marathi
देश / विदेश

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील जुन्या तरतुदी कायम राहणार | केंद्र सरकार

नवी दिल्ली | संसदेच्या पावसाळी अधिवेशनात भाजप सरकारच्या केंद्रीय मंत्रिमंडळाने अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील जुन्या तरतुदी पुन्हा लागू करण्यासाठीच्या बदलाला मंजुरी दिली आहे. हे दुरुस्ती विधेयक मांडण्यात येणार आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत तातडीने अटक होणार नाही, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. यानंतर संपूर्ण देशभरात जोरदार विरोध झाला होता.

अ‍ॅट्रॉसिटीच्या अंतर्गत एखाद्या व्यक्तीने केलेल्या आरोपाच्या आधारावर कुणालाही तातडीने अटक केली जाणे, हे समाजाला अशोभनीय कृती आहे. संसदेतील कलम २१चे उल्लंघन रोखणाऱ्या कायदा बनवू शकत नाही, असे मत नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने केंद्राच्या याचिकेवरील सुनावणी जुलै महिन्यात होणार होती. परंतु ही सुनावणी पुढे ढकलली. यानंतर आज केंद्रीय मंत्रिमंडळाने अ‍ॅट्रॉसिटी कायद्यातील बदलला मंजुरी दिली.

अ‍ॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत तक्रार केल्यास ताबडतोप अटक न करता, त्या व्यक्तीची प्राथमिक चौकशीनंतर संबंधित व्यक्तीला अटक करण्याच निर्णय घ्यावा, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने २० मार्चला दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर दलित संघटनांनी विरोध-प्रदर्शन, देशभर बंद पुकारला होता.या बंदमध्ये काही ठिकाणी दंगलीत अनेकांचे बळी गेले होते.

या दरम्यान केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका दाखल केली. अ‍ॅट्रॉसिटी कायद्याच्या निर्णयाबाबत फेरविचार करण्याची मागणी केली होती. परंतु सर्वोच्च न्यायालयाने आजपर्यंत झालेल्या सुनावणीमध्ये ही मागणी फेटाळली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कोर्टाच्या निर्णयावर राष्ट्रपती ट्रम्प संतप्त 

News Desk

महाराष्ट्रावर हल्ले होत असताना इतर मराठी नेत्यांनी स्वाभिमान दाखवावा, राऊतांना राज ठाकरेंवर निशाणा

News Desk

‘कोरोना’ प्रतिबंधक मास्क, टेस्टींग व पीपीई किट्स्, व्हेंटीलेटर्सवरील ‘जीएसटी’ माफ करा

News Desk
मुंबई

मुंबईत जेल भरो आंदोलनाला पूर्ण विराम

swarit

धनंजय दळवी | राज्यात गेल्या आठ दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलनाला सुरुवात झाली आहे. परंतु सरकार मराठा आरक्षणावर ठोस निर्णय घेत नसल्यामुळे संतप्त मराठा आंदोलकांनी आज जेल भरो आंदोलनाची हाक दिली होती. दुपारी कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर कारवाईकरून कार्यकर्त्यांना सोडण्यात आले. तसेच जेल भरो आंदोलनाला पूर्ण विराम लावला. राज्यभर सकल मराठा समाजाने आंदोलनाचा इशारा दिला होता. मुंबईत आज मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी आझाद मैदानात येऊन धरणे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

अंदाजापेक्षा कमी आंदोलक आल्याने पोलीस बंदोबस्त ऐनवेळी कमी करण्यात आला. काल रात्री कुणीतरी खोडसाळपणे आंदोलन रद्द केल्याचा संदेश फिरविण्यात आल्याने उपस्थिती कमी असल्याचे आंदोलकांनी सांगितले. गेल्या आठवड्याभरात राज्यभर मराठा समाजाची हिंसक आंदोलने झाली. गाड्यांची तोडफोड, जाळपोळ झाल्याने आजच्या मुंबईतील आझाद मैदानाच्या जेल भरो आंदोलनाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सकाळी आझाद मैदानात रॅपिड अ‍ॅक्शन पथकापाासून मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परंतु दुपारपर्यंत जेमतेम कार्यकर्तेच आंदोलनात सहभागी झाले. आम्ही कमी असलो तरी भारी आहोत. ‘एक मराठा-लाख मराठा’ ही आमच्या आंदोलनाची घोषणाच आहे, असे आंदोलक केदार सूर्यवंशी यांनी सांगितले.

‘नागपूरचा पोपट काय म्हणतो, मराठ्यांना आरक्षण नाय म्हणतो, आमच्या मागण्या पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा, कोण म्हणतो देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय, या सरकारचे करायचे काय, खाली डोके वर पाय, आदी जोरदार घोषणा देण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील आणि आमदार राम कदम यांच्या उलटसुलट वक्तव्यामुळेच शांततेत निघणार्‍या मराठा समाजाचे आंदोलक हिंसक झाल्याचा आरोप करीत त्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या.

मुख्यमंत्री यांनी खोटी चर्चा, राज्यपालांनी भेट नाकारली

मुख्यमंत्री यांनी खोटी चर्चा घडवून आणण्यामागे मराठा आंदोलनात फूट पाडण्याचा डाव आहे. यावरुन त्यांना राज्यात अराजकता ठेवण्यात जास्त रस आहे, असा आरोप सकल मराठा समाजाने केला आहे. तसेच मराठा समाजाच्या वतीने चालू असलेल्या आंदोलनाची राज्यपालांना भेटण्याची मागणी राज्यपालांनी फेटाळली. तसेच डीसिपी अभिषेक त्रिमुके यांनी राज्यपालांशी चर्चा करून संबंधित कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला.

Related posts

रोटरी क्लबचा “लहान बालक हृद्यरोग शस्त्रक्रिया प्रकल्प’ कौतुकास्पद

News Desk

चर्चच्या महिला प्रसाधनगृहात सीसीटीव्ही कॅमेरे

News Desk

अतिवृष्टीत बाधित झालेल्या मुंबई-ठाणेकरांना मिळणार नुकसान भरपाई

News Desk