HW News Marathi
देश / विदेश

‘भारत बंद’ मध्ये १० जणांचा मृत्यू

नवी दिल्ली | अ‍ॅट्रॉसिटी काद्यातील काही तरतुदीबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाविरोधात दलित संघटनांनी ‘भारत बंद’ पुकारला होता. या बंदला अनेक राज्यांमध्ये हिंसक वळण लागले. या बंदामध्ये देशभरात १० जणांचा मृत्यू झाला.मध्य प्रदेशमध्ये सहा जण, उत्तर प्रदेशातील दोन आणि राजस्थानमधील एकाचा मृतांचा समावेश आहे, तर अनेक जण जखमी झाले आहेत.

तसेच गुजरात, पंजाब, झारखंड, उत्तराखंड, बिहार आणि ओडिसा या राज्यात जमावाने दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोड केली. हे रोखण्यासाठी काही ठिकाणी पोलिसांनी गोळीबार आणि अश्रुधुराचा वापर केला. आंदोलन शांत करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्यात आली आहे.

  • मध्य प्रदेश बंदला हिंसक वळण

मध्य प्रदेशातील मुरैनामध्ये पोलिसांनी आंदोलकांवर गोळीबारीत सहा जणांचा मृत्यू झाला. एका वृत्तवाहिनीचा पत्रकार जखमी झाला आहे. मध्य प्रदेशमध्ये दंगलीचे वातावरण निर्माण होऊ लागल्यामुळे संपूर्ण राज्यात जमाव बंदी (कलम १४४) लागू करण्यात आली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

निकृष्ट दर्जाच्या जेवणाची तक्रार करणाऱ्या जवानाच्या मुलाचा मृत्यू

News Desk

खाद्यपदार्थ किती टिकणार, ते पाकिटावर लिहिणे बंधनकारक

News Desk

इंग्लंडच्या वेस्टमिन्स्टर न्यायालयाने पुन्हा एकदा नीरव मोदीचा जामीन अर्ज फेटाळला

News Desk