HW News Marathi
देश / विदेश

पुलवामातील हल्लेखोरांना कठोरातील कठोर शिक्षा व्हायला हवी | यूएनएससी

नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये पाकिस्तानस्थित दहशतवादी संघनटना जैश-ए-मोहम्मदने सीआरपीएफ जवानांवर केलेला हल्ला हा भ्याड आणि अक्षम्य असल्याची घणाघाती टीका संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने (यूएनएससी) केली. आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानला मोठ्या रोषाला सामोरे जावे लागत असून भारताला खंबीर पाठिंबा मिळत आहे.

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा उल्लेख करत असे हल्ले घडवून आणणाऱ्यांना कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या निवेदनात म्हणण्यात आले आहे. विशेष म्हणजे यूएनएससीमध्ये चीनचा समावेश असूनही देण्यात आलेले हे कठोर निवेदन पाकिस्तानसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याच्या भारताच्या मागणीला चीनकडून सातत्याने विरोध दर्शविण्यात आला आहे. असे असताना संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेने दिलेल्या निवेदनात जैश-ए-मोहम्मदचा करत पुलवामातील हल्लेखोरांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी भारताला सहकार्य करण्याचे आवाहन आंतरराष्ट्रीय समुदायाला करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२९ वस्तूवरील जीएसटी हटवली

swarit

ब्लू व्हेल’ गेमच्या अॅडमीनला अटक

News Desk

अयोध्या प्रकरणी मध्यस्थी समितीचा अहवाल आज सर्वोच्च न्यायालयात सादर होणार

News Desk