HW News Marathi
देश / विदेश

वनविभागाच्या पथकाला दिसले अवनी वाघिणीचे बछडे ?

यवतमाळ | यवतमाळमध्ये आज (गुरुवार) पेट्रोलिंग करणाऱ्या वन विभागाच्या पथकाने नरभक्षक अवनी वाघिणीचे २ बछडे दिसल्याचे म्हटले आहे. दरम्यान, अवनी वाघिणीला ठार केल्यानंतर वनविभागासमोर तिच्या बछड्यांचा शोधण्याचे मोठे आव्हान आहे. त्यासाठी वनविभागाकडून तब्बल सात पथके तयार करण्यात आली आहेत. वनविभागाचे पथक सराटी, बोराटी, वरूड, भुलगड इत्यादी भागात अवनी वाघिणीच्या बछड्यांचा शोध घेत आहेत.

अवनी वाघिणीचे बछडे सध्या केवळ १० ते ११ महिन्यांचे आहेत. आपल्या आईचा शोध घेण्यासाठी ते कुठेही भटकू शकतात. अवनी वाघिणीसोबत असणारा नर वाघसुद्धा याच परिसरात फिरत असल्यामुळे तो या बछड्यांना मारू शकतो, या भीतीमुळे त्यांचा लवकरात लवकर शोध घेणे अत्यंत आवश्यक आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘पेगॅसस’ची चौकशी केली असती तर देशाला अस्मिता आहे हे दिसलं असतं!

News Desk

पवार विरोधी पक्षात असते तर त्यांनी ढोंगीपणा आणि नाटकं केली असती !

Arati More

मोदींच्या ‘मन की बात’ व्हिडिओला ४ लाखांपेक्षा जास्त डीसलाईक

News Desk
देश / विदेश

शोपियानमध्ये २ दहशतवाद्यांना जवानांनी घेरले

News Desk

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात सोमवारी (३ डिसेंबर) पहाटेपासूनच जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. शोपियान जिल्ह्यातील सनग्रान परिसरात एक घरामध्ये तीन दहशतवादी लपल्याची माहिती जवानांना मिळाली. यानंतर जवानांनी या संपुर्ण परिसराला घेराव घातला आहे. भारतीय सैन्य, सीआरपीएफ आणि एसओजी यांनी दहशतवाद्यांविरोधात संयुक्त मोहीम सुरू आहे. त्यानुसार सनग्रानमध्ये एका घरात दहशतवादीलपल्याची माहिती भारतीय लष्कराला मिळाल्यानंतर शोध मोहीम सुरू करण्यात आली. दहशतवाद्यांनी जवानांवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केल्यानंतर जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे.

दक्षिण काश्मीरच्या शोपियां जिल्ह्यात शनिवारी (२४ नोव्हेंबर) मध्यरात्री सुरू होऊन रविवारी सकाळपर्यंत सुरू राहिलेल्या सशस्त्र चकमकीत सुरक्षा दलांनी ६ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दरम्यान, दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक जवान शहीद झाला होता. संशयित दहशतवादीम्हणून मारल्या गेलेल्या सहांपैकी पाच जण स्थानिक युवक होते. सहावा पाकिस्तानी नागरिक असावा, असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी सहा दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर लगोलग करण्यात आलेली ही मोठी कारवाई आहे.

Related posts

धक्कादायक ! राफेल कराराची महत्त्वाची कागदपत्रे चोरीला, महाधिवक्त्यांची माहिती

News Desk

कश्मीरचे पुन्हा नंदनवन बनो!

News Desk

CDS बिपीन रावत यांना दिग्गजांनी वाहिली श्रद्धांजली

News Desk