HW News Marathi
देश / विदेश

जम्मू-काश्मीरमधील पुलवामात २ दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर | जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. बुधवारी (२८ नोव्हेंबर) रात्री अवंतीपुरा परिसरात भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. ठार करण्यात आलेल्‍या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात दारूगोळा आणि काही शस्‍त्रे जप्त करण्यात आली आहेत.

गेल्‍या पाच ते सहा दिवसांपासून दहशतवादी आणि भारतीय लष्कर यांच्या चकमकी सुरू आहेत. गेल्‍या सहा दिवसांत भारतीय लष्‍कराने २२ दहशतवाद्यांना ठार केले आहे. पाकिस्तानकडून सीमारेषेवर होणाऱ्या कुरापती दिवसेंदिवस वाढतच आहेत. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय भारतीय हद्दीत जास्तीत जास्त दहशतवाद्यांची घुसखोरी घडवण्याच्या प्रयत्नात असल्‍याची सुत्रांकडून माहिती मिळाली आहे.

बुधवारी बडगाम जिल्ह्यात झालेल्या चकमकीमध्ये जवानांनी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर नवीद जटला कंठस्नान घातले. जम्मू काश्मीरमधील ‘रायझिंग काश्मीर’ वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येत नवीद जटचा सहभाग होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जम्मू-काश्मीरच्या बडगाम येथील चकमकीत २ दहशतवाद्यांना कंठस्नान

News Desk

विकास दुबे चकमक प्रकरण म्हणजे आपल्या सहकाऱ्यांच्या मृत्यूचा पोलिसांनी घेतलेला सूड आहे

News Desk

सीबीआयचे नाट्य घडवले जात आहे !

swarit