HW News Marathi
देश / विदेश

अयोध्या प्रकरणी २६ फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

नवी दिल्ली | अयोध्येतील रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणाची सुनावणी आता मंगळवारी (२६ फेब्रुवारी) होणार आहे. ही सुनवाणी सकाळी १०.३० वाजच्या सुमारास होणार असल्याची माहिती सर्वोच्च न्यायालयाचे सर न्यायाधीश रंजन गोगोई यांनी दिली आहे. पाच सदस्यीय घटनापीठासमोर अयोध्या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार असल्याचे गोगोई यांनी सांगितले आहे. पाच सदस्यीय घटनापीठाचे सदस्य सुट्टीवरून आले असल्याची माहिती गोगोई यांनी दिली आहे.

यापूर्वी २९ जानेवारीला या प्रकरणाची सुनावणी होणार होती. परंतु सुनावणीसाठी नव्याने निर्माण केलेल्या घटनापीठातील न्यायमूर्ती एस. ए. बोबडे अनुपस्थित राहणार होते. त्यामुळे या प्रकरणाची सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. याआधी गोगोई यांनी शुक्रवारी (२५ जानेवारी) पाच सदस्यीय घटनापीठाची नव्याने स्थापना केली होती. घटनापीठामध्ये न्यायमूर्ती अशोक भुषण, आणि न्यायमूर्ती अब्दुल नाझीर यांचा समावेश केला होता.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्यायमूर्ती अशोक भुषण, न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड, आणि न्यायमूर्ती अब्दुल नाझीर यांचा या पाच घटनापीठामध्ये समावेश करण्यात आला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईत पेट्रोल ९ पैशांनी महागले, सामान्यांचे हाल

Gauri Tilekar

भारतीय उद्योगांच्या विकासात भरीव योगदान देणारा देशाभिमानी उद्योजक गमावला! – मुख्यमंत्री

Aprna

भारतीय लष्कराला तोफांच्या रूपात दिवाळी भेट

swarit