HW News Marathi
देश / विदेश

Ayodhya Verdict : त्रिसदस्यीय समितीत तटस्थ व्यक्तीची नेमणूक करणे योग्य ठरले असते !

नवी दिल्ली | अयोध्या राम जन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणी आज (८ मार्च) झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाकडून त्रिसदस्यीय मध्यस्थी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या त्रिसदस्यीय समितीत श्री. श्री. रविशंकर, ज्येष्ठ वकील श्रीराम पंचू आणि न्या. खल्लीफुल्ला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाबाबत एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “या त्रिसदस्यीय समितीत सर्वोच्च न्यायालयाने तटस्थ व्यक्तीची नेमणूक करणे योग्य ठरले असते”, असे मत ओवेसी यांनी व्यक्त केले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अयोध्या रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद जमीन वाद प्रकरणी मध्यस्थांची नेमणूक केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या त्रिसदस्यीय समितीतील श्री श्री रवीशंकर यांच्या नावाला ओवेसींचा विरोध आहे. सर्वोच्च न्यायालयाने तटस्थ व्यक्तीची नेमणूक केली असती तर जास्त योग्य झालं असतं असे मत ओवेसी यांनी व्यक्त केले आहे. “सर्वोच्च न्यायालयाने या त्रिसदस्यीय समितीत तटस्थ व्यक्तीची नेमणूक करणे अधिक योग्य ठरले असते”, असे मत ओवेसी यांनी व्यक्त केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कश्मीरमध्ये १३ दहशतवाद्यांना कंठस्नान, ३ जवान शहीद

News Desk

अयोध्या प्रकरणी आजपासून नियमित सुनावणी

News Desk

#PulwamaAttack : पाकिस्तानी वृत्तपत्राने दहशतवाद्यांना म्हटले ‘स्वातंत्र्यसैनिक’

News Desk