HW News Marathi
देश / विदेश

#AyodhyaVerdict : अयोध्या निकालानंतर व्यक्त होणे टाळा, अफवांवर विश्वास ठेऊ नका

नवी दिल्ली। बहुप्रतिक्षित अयोध्या प्रकरणावर आज (९ नोव्हेंबर) अंतिम सुनावणीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांना या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेबद्दल खबरदारी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा, शांतता राखण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मात्र निकालानंतर व्हॉट्सअॅप, फेसबुक किंवा सोशल मीडियातून आक्रमक आणि भडकाऊ टीका-टिप्पणी करणे टाळावे, असे आवाहनही पोलिसांकडून केले जात आहे.

राममंदिरासंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा. शांतता व संयम राखण्याचे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या प्रकरणातील सर्व बाजू आणि सर्व पक्षांना ऐकल्यानंतरच हा निकाल सर्वोच्च न्यायालय देणार आहे. या निकालानंतर समाजामध्ये कोणत्याही तेढ निर्माण होऊ नये, समाजात सलोखा राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. कुणाच्याही भावना दुखावणार नाहीत, अशाच प्रकारे आपली अभिव्यक्ती असली पाहिजे. या निकालाचा सर्वांनी सन्मान करावा आणि संयम राखून कायदा-सुव्यवस्था राखण्यास योगदान द्यावे. कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नये.

पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे उल्लंघन करुन जातीय तणाव निर्माण केल्यास, भावना भडकवल्यास भारतीय दंड संहिता कलम आणि इतर कायद्यांन्वये कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी नागरिकांनी घ्यावी असे आवाहनही करण्यात येत आहे.

अयोध्या प्रकरणाची नियमित सुनावणी

यावर्षी ५ ऑगस्टपासून अयोध्या प्रकरणाची निकालाची नियमित सुनावणी सुरु झाली होती. त्यानंतर जवळपास ४० दिवसांच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला होता. सरन्यायाधीश रंजन गोगोई येत्या १७ नोव्हेंबरला निवृत्त होत आहेत. तसेच सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठ आज निकाल देणार आहेत. यात न्यायमूर्ती एस. ए. बोबडे, न्यायमूर्ती डी. वाय. चंद्रचूड, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती अब्दुल नझीर यांचा समावेश आहे. त्यामुळे पुढच्या आठवड्यात निकाल लागेल अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आज सुट्टीच्या दिवशीच सर्वोच्च न्यायालयाने निकाल देण्याचे ठरवले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायमूर्तीचे घटनापीठ हा निकाल सुनावणार आहे.

अयोध्या निकालानंतर या गोष्टी टाळा

जमाव करुन थांबू नका, भाषणबाजी करु नका.

सोशल मीडियावर अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर कोणत्याही धर्माच्या भावना दुखावतील असे मेसेज फॉरवर्ड करु नका.

निकालानंतर घोषणाबाजी करुन जल्लोष करु नये, गुलाल उधळू नये, फटाके वाजवू नयेत.

मिरवणूक रॅली काढू नये किंवा बाईल रॅली काढू नये.

महाआरती किंवा समूह पठण यांचं आयोजन करु नये.

निकालानिमित्त पेढे, मिठाई वाटू नये. कोणतंही वाद्य वाजवू नये.

कोणत्याही प्रकारची जातीय दंगल होईल, असे जुने व्हिडीओ, फोटो पुन्हा सोशल मीडियावर शेअर करुन अफवा पसरवू नये.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बिष्णोई समाजामुळे सलमानला ५ वर्षाची शिक्षा

News Desk

ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर हल्ला, कोलकाताच्या रुग्णालयात उपचार

News Desk

अखेर राहुल गांधींनी सांगितलं मोदींची गळाभेट घेण्याचं कारण

News Desk