HW News Marathi
देश / विदेश

कार ब्लास्टमध्ये रामरहीमचा हात

चंदीगड रामरहीमला अटक झाल्यानंतर अनेक गोष्टी समोर येत आहेत. बंठीडा येथील मोर मंडीत झालेल्या कार स्फोटात रामरहीमचा हात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यामुळे रामरहीम अजून अडचणीत येणार आहे.

रामरहीमच्या मुलाच्या सास-याला मारण्यासाठी हा स्फोट घडवून आणल्याचं सांगण्यात येत आहे. रामरहीमच्या मुलाच्या सास-याचा नाव हरमिंदर सिंह जस्सी आहे हे माजी आमदार हरमिंदर सिंह जस्सी हे पंजाबमधील काँग्रेसचे मोठे नेते मानले जातात.

टाइम्स नाऊ’ या वृत्तवाहिनीला मिळालेल्या माहितीत हा गौप्यस्फोट झाला आहे. पंजाब विधानसभा निवडणुकीच्यावेळी मोर मंडीत झालेल्या या कार स्फोटात ६ लोक ठार झाले होते, तर १४ लोक गंभीर जखमी झाले होते. ‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तानुसार या स्फोटासाठी लागणारे टायमर्स, बॅट्री आणि बॉम्ब बनविण्याची उपकरणे सिरसामध्ये खरेदी करण्यात आले होते. सिरसामध्येच डेरा सच्चा सौदाचं मुख्यालय आहे.

रामरहीमचा मुलगा जसमीत सिंह याचा सासरा हरमिंदर सिंह जस्सी यांना मारण्यासाठी हा स्फोट घडवून आणल्याचं सांगण्यात येतं. हत्येचा कट उघड झाल्याने हरमिंदर सिंह यांनी या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बिहारमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना

swarit

आंध्र प्रदेशच्या पहिल्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी घेतली शपथ

News Desk

एकाच स्पर्धेत रौप्य आणि कांस्य पदक भारताच्या पठ्ठ्यांना!

News Desk
क्राइम

संघ मुख्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

News Desk

नागपूर : रॉकेलची बाटली हातात घेऊन एका युवकाने महालमधील शनिवारी सायंकाळी संघ मुख्यालयात घुसण्याचा प्रयत्न केला. वेळीचसीआयएसएफच्या जवांनानी त्याला ताब्यात घेतल्याने अनर्थ टळला. बेरोजगारीला कंटाळून हा युवक संघ मुख्यालयासमोर आत्मदहनकरण्याच्या प्रयत्नात होता, असे सांगण्यात येते. या घटनेची नोंद कोतवाली पोलिसांनी केली असून, त्याला नातेवाईकांच्या स्वाधीन केलेआहे. संतोष, असे या युवकाचे नाव आहे.

संतोष हा उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. तो बीटेक झाला आहे. उच्च शिक्षित असतानाही त्याला नोकरी मिळाली नाही. त्यानेतेथील प्रशासनाला वेळोवेळी नोकरी मिळण्याबाबत विनवणी केली. त्याला कोणीही दाद दिली नाही. त्यामुळे तो हताश झाला होता.

‘मी उच्च शिक्षत आहे, मला नोकरी मिळत नाही. उत्तर प्रदेश प्रशासन मला न्याय देत नाही, संघ मुख्यालयात मला न्यायमिळेल, या मुळे मी येथे आलो आहे’,असे तो सांगत होता. सीआयएसएफच्या जवानांनी कोतवाली पोलिसांना माहिती दिली.

Related posts

दरोडेखोरांकडून बँक अधिकाऱ्यासह पत्नीचा खून; दोन मुली जखमी

News Desk

नक्षल्यांनी केली पंचायत समितीच्या कंत्राटी कर्मचाऱ्याची हत्या

News Desk

गटविकास अधिकारी लाच घेताना रंगेहात अटक

News Desk