HW News Marathi
देश / विदेश

अखेर लालूप्रसाद यादव यांना जामीन मंजूर, ४२ महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर येणार

झारखंड | दुमका कोषागार घोटाळ्याप्रकरणी राजदचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना अखेर जामीन मंजूर झाला आहे. झारखंड उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. ४२ महिने ११ दिवस तुरुंगात राहिल्यानंतर अखेर लालूप्रसाद यादव तुरुंगाच्या बाहेर येणार आहेत. कागदपत्रांची सर्व प्रक्रिया पार पाडल्यानंतर ते तुरुंगातून बाहेर येतील, असं सूत्रांनी सांगितलं आहे.

लालूप्रसाद यादव यांच्या जामिनाच्या याचिकेवर कालच सुनावणी होणार होती. मात्र, कोर्ट बंद असल्याने काल ऐवजी आज सुनावणी पार पडली. जेल मॅन्युअलनुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर लालूप्रसाद यावद तुरुंगाबाहेर येणार आहेत. कोरोनामुळे बेल बाँड भरण्याच्या प्रक्रियेला वेळ लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, लालूप्रसाद यांच्यावर दिल्लीच्या एम्समध्ये उपचार सुरू आहेत. आता कोणत्या रुग्णालयात उपचार करायचे हे त्यांच्यावर अवलंबून असणार आहे.

दुमका कोषागार गैरव्यवहार प्रकरणात लालू प्रसाद यादव यांनी अर्धी शिक्षा पूर्ण केली आहे. हा दावा जामीन अर्ज दाखल करताना करण्यात आला होता. या प्रकरणी सीबीआय न्यायालयाने लालू प्रसाद यादव यांना सात-सात वर्षांची शिक्षा सुनावली होती.

वेगवेगळ्या कलमांतर्गत ही शिक्षा ठोठावण्यात आली होती. त्यामुळे लालू प्रसाद यादव यांनी शिक्षेचा अर्धा कालावधी पूर्ण केला नसल्याचा दावा सीबीआयने केला होता. तर चाईबासा आणि देवघर प्रकरणात लालू यादव यांना यापूर्वीच जामीन मिळाला आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांच्याविरूद्ध FIR दाखल 

News Desk

Ayodhya Verdict : आता सुनावणीची तारीख २९ जानेवारीला होणार निश्चित

News Desk

ताजमहाल की शिवमंदिर?

News Desk