HW News Marathi
देश / विदेश

पत्नीला गोळी मारण्यापेक्षा तिहेरी तलाक देऊन मुक्तता देणे केव्हाही चांगले !

नवी दिल्ली | “पत्नीला गोळी मारण्यापेक्षा तिहेरी तलाक देऊन तिला मुक्तता देणे केव्हाही चांगले आहे”, असे वादग्रस्त वक्तव्य समाजवादी पक्षाचे खासदार एस.टी. हसन यांनी केले आहे. लोकसभेत आज (२५ जुलै) तिसऱ्यांदा तिहेरी तलाक विधेयक मांडण्यात आले आहे. लोकसभेत हे विधेयक पास झाले असले तरीही पुन्हा विरोधकांनी सुचवलेल्या बदलांचा विधेयकात समावेश करून या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर हसन बोलत होते. या विधेयकाला लोकसभेत मंजुरी मिळाल्यानंतर ते राज्यसभेत मांडले जाईल.

“इस्लामने महिलांसोबत खूप न्याय केला आहे. तिला हवे तेव्हा ती आपल्या पतीपासून वेगळी होऊ शकतेसरकारने कोणत्याही धर्माच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये. एकाच वेळी सर्व लोक तिहेरी तलाक मानत नाहीत. त्यासाठी एका महिन्याची मुदत दिली जाते. एकेकदा तर अशी वेळ येते कि, पती-पत्नीला विभक्त होण्याव्यतिरिक्त दुसरा पर्याय उरत नाही. अशा वेळी पत्नीला गोळी मारण्यापेक्षा तिहेरी तलाक देऊन तिला सोडून देणे केव्हाही चांगलेच”, असे विधान खासदार एस.टी. हसन यांनी केले आहे.

केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी यापूर्वी २१ जून रोजी संसदेत तिहेरी तलाक विधेयक मांडले होते. मात्र, विरोधकांनी या विधेयकावरून संसदेत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. यावेळी एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी, काँग्रेसचे नेते शशी थरुर यांनी देखील या विधेयकास जोरदार विरोध दर्शविला होता. इतकेच नव्हे तर काँग्रेस आणि एआयएडीएमके या दोन्ही पक्षांनी वॉकआऊट देखील केले होते. मात्र, “हे तिहेरी तलाक विधेयक मुस्लिम महिलांच्या अधिकारांचे जतन करण्यासाठी किंवा त्यांना न्याय देण्यासाठी नसून मुस्लिम पुरुषांना शिक्षा देण्यासाठी आहे”, असा आरोप करत विरोधी पक्षांनी मोदी सरकारच्या या विधेयकाला स्पष्ट विरोध केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पंतप्रधानांनी राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी साधला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद

News Desk

ओडिशानंतर आता ‘या’ राज्यातही १ मेपर्यंत लॉकडाऊन

News Desk

समाजमाध्यमांचा वापर करून निवडणुका मोदी व भाजपने जिंकल्या आणि आता ‘टुलकिट’ उलटले? – संजय राऊत

News Desk