HW News Marathi
देश / विदेश

पंतप्रधानांनी राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी साधला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद

नवी दिल्ली | कोरोनाचा देशभरातील उद्रेक काही केल्या कमी होत नाही आहे. दरम्यान, देशावर आलेल्या या संकटातृच्या काळात राज्य आणि केंद्र सरकार एकत्रित येऊन काम करत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (२ एप्रिल) राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या संवादात त्यांनी देशात सुरु असलेल्या २१ दिवसांच्या लॉकडाऊनवर जास्त भर दिला. दरम्यान, प्रत्येक राज्यातील नागरिक लॉकडाऊनचे नियम पाळत आहेत ना यावर सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे अशा सुचनाही पंतप्रधानांनी दिल्या. तसेच, नागरिकांना कोणत्याही अत्यावश्यक सेवांची कमतरता होऊ नये यावरही लक्ष देण्यास सांगितले आहे.

तसेच, काही राज्यांच मजुरांचे पलायन थांबवावे असेही त्यांनी सांगितले. या मजुरांच्या राहण्याची, खाण्याची सर्व सोय करावी आणि मजुरांनीही रस्त्यावर येऊ नये असेही आवाहन पंतप्रधानांनी केले. देशातील कोरोनाच्या वाढत्या संख्येकडे पाहता ज्यांच्यात कोरोनाची लक्षमे दिसत असतील त्यांना तात्काळ क्वॉरंटाईन करा आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही क्वॉरंटाईन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. पंतप्रधानांनी साधलेल्या या व्हिडिओ कॉन्फरन्समूळे विविध राज्यांतील मुख्यमंत्र्यांना एक प्रकारे दिलासा मिळाला असणार आहे. लवकरात लवकर हे कोरोनाचे संकट भारतातून जावे यासाठी संपूर्ण देश प्रयत्न करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शबरीमालामध्ये महिलांना ‘प्रवेश’च नाही

swarit

निर्मला सीतारामण यांचा आजचा शेवटचा अर्थसंकल्प ?

swarit

सरन्यायाधीश दीपक मिश्रा सेवानिवृत्त, भारतीय न्यायव्यस्थेचे केले कौतुक

Gauri Tilekar