HW News Marathi
देश / विदेश

इमरान खान सरकारच्या नाकर्तेपणामुळे मुजफ्फराबाद वाचवणेही मुश्कील !

इस्लामाबाद । “पहिला आमची निती ही श्रीनगर घेण्याची होती, मात्र आता इमरान सरकारच्या नाकर्तेपणामुळे मुजफ्फराबाद वाचवणेही मुश्कील झाले आहे,” असा टोला पाकिस्‍तान पीपल्‍स पार्टीचे चेअरमन बिलावल भुट्टो यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खानला लागवला आहे. काश्मीरमधून कलम ३७० हटवल्‍याने पाकिस्‍तानचा चांगलाच जळफळाट झाला आहे. यात पाकिस्तानने काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर हा मुद्दा मांडला. परंतु त्यांच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान एकटा पडला. यानंतर पाकिस्तानचे खान यांनी त्यांच्या देशातील विरोधकांकडून कठोर शब्दात टीका केली जात आहे.

बिलावल भुट्टो यांनी कठोर शब्‍दात टीका करताना इमरान खान यांच्यावर आरोप लावला की, “इमरान यांना पाकिस्‍तानच्या जनतेने निवडले नाही. ते काही लोकांच्या हातातले बाहूले बनून सत्‍तेवर बसले आहेत. इमरान सरकार हे अपयशी ठरले आहे. तसेच बिलावल यांनी पुढे बोलताना इमरान यांनी देशातील जनता महागाईने त्रासली आहे. दुसरीकडे काश्मीर ही आपल्‍या हातातून निसटून गेला. अशावेळी इमरान यांनी काही लोकांना खुश करण्यासाठी वेळ न घालवता देशाकडे लक्ष देण्याची गरज असल्‍याचे म्‍हटले आहे.”

भुट्टो यांनी इमरान सरकारवर निशाणा साधण्याची एकही संधी न सोडता, हे आतापर्यंतचे सर्वात नाकर्ते सरकार असून, या सरकारमुळे देशातील लोकशाही धोक्‍यात आली आहे. महागाईमुळे जनतेला जगणे कठीण झाले आहे. त्‍यात आता काश्मीरही हातातून गेल्‍याने याला सर्वस्‍वी इमरान सरकार जबाबदार बसल्‍याचे सांगितले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जी 20’ मध्ये मोदी-शी चर्चा होणार नाही: चीन

News Desk

चारित्र्यहनन करुन आरक्षणाच्या मुळ मुद्याला बगल देता येणार नाही- हार्दिक पटेल

News Desk

क्राइम सीरिअल पाहून तिघांनी लुटली बँक, टॅटूवरून चोरीचा छडा

News Desk