HW News Marathi
देश / विदेश

नथुराम गोडसे हा देशभक्त होता, देशभक्त आहे आणि देशभक्त राहील !

भोपाळ | मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना भाजपकडून भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारी मिळाल्यापासून नेहमीच वादग्रस्त विधानाने चर्चेत राहतात आहे. आता प्रज्ञा सिंह यांनी महात्मा गांधी यांची हत्या करणारे ”नथुराम गोडसे हा देशभक्त होता, देशभक्त आहे आणि देशभक्त राहील,” असे वादग्रस्त विधान करून पुन्हा एकदा मुक्ताफळे उधळली आहेत. या विधानानंतर नव्या वादाला तोंड फुटले आहे.

प्रज्ञा सिंह यांनी एका मालवाड जिल्ह्यातील एका रोड शोदरम्यान प्रसार माध्यमांशी बोलताना वादग्रस्त विधान केले आहे. गेल्या काही दिवसापूर्वी ‘महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हे स्वतंत्र भारतातील पहिले दहशतवादी होता,’ असे वादग्रस्त विधान दाक्षिणात्य सुपरस्टार आणि मक्कल निधी मियाम या पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी केले होते. यानंतर संपूर्ण प्रकरण देशभरात वादविवाद पाहायला मिळत आहेत.

तसेच साध्वी प्रज्ञा सिंह यांनी यापूर्वी वादग्रस्त वक्तव्य केले होते. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी शहीद झालेले एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांचा मृत्यू आपण दिलेल्या शापामुळे झाला, असा दावा प्रज्ञा सिंह यांनी केला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अनंतनागमध्ये सहा दहशतवाद्यांचा खात्मा

News Desk

भूकंपाच्या धक्क्याने पाकिस्तानसह उत्तर भारत हादरले

swarit

कोकणात मदतीसाठी ‘नेव्ही रेस्क्यू फोर्सची’ आवश्यकता, सुप्रिया सुळेंची संरक्षण मंत्र्यांकडे मागणी

News Desk