HW News Marathi
देश / विदेश

नथुराम गोडसेला देशभक्त म्हणणाऱ्या प्रज्ञा सिंह यांनी सार्वजनिक माफी मागावी | भाजप

नवी दिल्ली | “नथुराम गोडसे हा देशभक्त होता, देशभक्त आहे आणि देशभक्त राहील,” असे वादग्रस्त विधान भाजपच्या भोपाळच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह यांनी केले आहे. प्रज्ञा सिंह यांनी केलेल्या वादग्रस्त विधानाचा पक्षांशी काही संबंध नसून त्यांनी सार्वजनिक माफी मागावी अशी मागणी, भाजपचे प्रवक्ता जीव्हीएल नरसिंह राव यांनी केली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि भोपाळचे काँग्रेसचे उमदेवार दिग्विजय सिंह यांनी म्हटले की, या निवेदनाचे मी निषेध करतो, नथुराम गोडसे एक खूनी होते, त्याचे गौरव करणारे देशभक्ती नाही, हे राजद्रोही आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी प्रज्ञा सिंह यांच्या वादग्रस्त विधानावर माफी मागावी, असे म्हणाले आहेत.

तसेच साध्वी प्रज्ञा सिंह यांनी यापूर्वी वादग्रस्त वक्तव्य केले होते. २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यावेळी शहीद झालेले एटीएसचे प्रमुख हेमंत करकरे यांचा मृत्यू आपण दिलेल्या शापामुळे झाला, असा दावा प्रज्ञा सिंह यांनी केला होता.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ममता बॅनर्जी नावाची एकटी वाघीण ‘भाजप’ला पुरून उरेल!

News Desk

पंतप्रधानांनी एनडीआरएफच्या स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा

News Desk

महाराष्ट्रातील शैक्षणिक वर्ष जानेवारीपासून सुरु करण्याच्या प्रस्तावाला युजीसीकडून पाठिंबा

News Desk