HW News Marathi
देश / विदेश

भाजपची हिंदूत्वाची व्याख्या बदलत आहे…

नवी दिल्ली- हिंदुत्वाच्या नावाने देशभर हिंसाचार माजवून लोकांचे बळी घेणे, जातीपातीचे राजकारण करून मते मिळवणे सत्ताधाऱ्यांना डोईजड झाले आहे. त्यामुळे त्यांना आपल्या मूळ कट्टर भूमिकांमध्ये बदल करण्याशिवाय पर्याय उऱला नाही. त्याचाच भाग म्हणून दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांच्यावरील कार्यक्रमादरम्यान युवकांना सल्ला दिला. ते म्हणाले की कुणी काय खावे आणि काय खावू नये, हा ज्याच्या त्याचा प्रश्न आहे. असेचे वक्तव्य संघप्रमुख मोहन भागवत यांनी आज केले आहे. हिंदुत्व म्हणजे कोण काय खात आहे किंवा काय परिधान करत आहे, हे ठरवणं म्हणजे हिंदुत्व नाही तर, इतरांना ते जसे आहेत तसे त्यांचा स्वीकार करणं म्हणजे हिंदुत्व, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे. सध्या देशातीलराजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मोहन भागवत यांनी केलेले विधान महत्त्वपूर्ण असे आहे.

बिफ खाणे, बाळगण्यावरून देशात अनेकांचे प्राण घेण्यात आले आहे, कोणी काय खावे किंवा काय खावू नये, हा ज्याच्यात्याचा प्रश्न आहे. परंतु याच मुद्याचे राजकारण करत ठिकठिकाणी हिंसा घडत आहेत. त्या देशासाठी मारक असल्याचे सध्या सत्ताधाऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे त्यांनी हा मुद्दा कसा गैर आहे, हे पटवून देण्यासाठी धडपड सुरू केली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतीय उद्योगांच्या विकासात भरीव योगदान देणारा देशाभिमानी उद्योजक गमावला! – मुख्यमंत्री

Aprna

इंधन दरवाढ, पेट्रोल १७ पैसे तर डिझेल १९ पैशांनी महागले

News Desk

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! चुलत भावांच्या मुलांपेक्षा वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा अधिकार अधिक

Aprna