HW News Marathi
देश / विदेश

हवामान बदलामुळे पहिल्याच दिवशी अमरनाथ यात्रेला ब्रेक

जम्मू कश्मीर | हवामानात झालेल्या बदलामुळे अमरनाथ यात्रेच्या पहिल्याच दिवशी लोकांना प्रवासा दरम्यान अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. प्रचंड पाऊस पडल्यामुळे काही जागी जमीन खचली आहे. त्यामुळे भक्तांचा प्रवास काही वेळासाठी थांबविण्यात आलेला आहे. सध्या हे प्रवासी भक्त बालटाल व पहलगाम येथे थांबले आहेत. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार कालच जम्मू कश्मीर मध्ये हवामान बदलामुळे अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामध्ये येत्या ३-४ दिवसांपर्यंत प्रचंड पावसाची शक्यता दर्शविण्यात आली आहे. श्राइन बोर्डाच्या एका अधिका-यांने दिलेल्या माहितीनुसार पाऊस आणि हवामान बदलामुळे अद्याप ही यात्रा सुरु करण्यात आलेले नाही.

संबंधित अधिका-यांने बोलताना स्पष्ट केले आहे की जोपर्यंत हवामान ठिक होत नाही आणि बाबा बर्फानी पर्यंत पोहचण्यासाठी रास्ते ठीक होत नाहीत तोपर्यंत हि यात्रेसाठी भक्त पुढे जाऊ शकत नाही. जम्मू मधून काल सकाळी निघालेल्या भक्तांच्या पहिल्या ग्रुपमध्ये जवळपास २९९५ भाविकांचा समावेश आहे. तसेच जम्मूमधून सुमारे ३४०० भक्त आज बाबा बर्फानीच्या दर्शनासाठी रवाना झाले होते. परंतु प्रवासाच्या सुरुवातीच्या काळात हवामान ठिक नसल्यामुळे बेस कॅम्पमध्ये तीर्थयात्रेसाठी गर्दी होत आहे. यावेळी भक्तांच्या सुरक्षेसाठी विषेश काळजी घेण्यात आली आहे. त्यासाठी प्रवासाच्या वेळी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे, ज्यात रेडिओ फ्रिक्वेंसी चिप आणि वाहनावर विशेष मोटरसायकल स्क्वॉड तयार करण्यात आले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अडीच माणसांनी देश बर्बाद केला

News Desk

पुलवामासारख्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, सुरक्षा दलाने कारमधून IED केले जप्त

News Desk

सोनिया गांधीच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षपदी राहणार

News Desk
महाराष्ट्र

पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेत सुदामवाडी गाव प्रथम 

News Desk

पुणे । सत्यमेव जयते वॉटर कपच्या माध्यमातून कोणत्याही गावाला पैसे न देता, दत्तक न घेता, फक्त जलसंधारणाचे शिक्षण आणि दिशा देऊन काही बदल घडवता येतो का, हा प्रयत्न अभिनेता अमीर खाने केला होता. पाणी फाउंडेशन अंतर्गत वॉटर कप स्पर्धेचा निकाल आज पुण्यात जाहीर करण्यात आला.

बार्शी तालुक्यातील सुदामवाडीने प्रथम कोल्ही द्वितीय तर सावखेड गावाने तृतीय क्रमांक पटकावला आहे. या स्पर्धेत एकूण ४००० गावांनी सहभाग घेतला होता. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज उपस्थित होते.

Related posts

तुम्ही फक्त ‘घाबरत नाही’ सांगा, मग आम्ही उद्यापासून…!; आता मलिकांचा शेलारांना मोठा इशारा

News Desk

“… तर तुझ्या डोक्यात ६ गोळ्या घालेन”, धनंजय मुंडे प्रकरणाने राजकारण पेटलं 

News Desk

‘मला शरद पवारांना भेटायला आवडतं’, पवारांच्या भेटींबाबत राऊतांच भाष्य

News Desk