HW News Marathi
मुंबई

पायलटच्या सतर्कतेला सलाम, घाटकोपरकरांचे वाचवले प्राण

मुंबई | घाटकोपरमध्ये क्रॅश झालेले चार्टर्ड विमान कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत महिला पायलट मरिया कुबेर यांच्या प्रसंगावधानाने घाटकोपरकरांचे प्राण वाचले. परंतु या दुर्घटनेत पायलट मरिया यांना जीव गमवावा लागला. चार्टर्ड विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचे समजल्यानंतर गर्दीच्या ठिकाणावरून विमान बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या कम्पाऊंडमध्ये लँडिंग केले.

पायलट यांना प्रशिक्षणादरम्यान अशा प्रकारचे ट्रेनिंग दिले जाते. या ट्रेनिंगमुळे मोठी दुर्घटने टळली. परंतु दुदैवाने पायलटसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मरिया यांच्या प्रसंगावधानामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. परंतु, हे कौतुक ऐकण्यासाठी मरिया कुबेर मात्र आपल्यात नाही.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२०० रूपयांची नोट लवकरच

News Desk

डॉक्टरावर कोयत्याने हल्ला

News Desk

शेतीसाठी माहिती तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकते | व्यंकय्या नायडू

Gauri Tilekar