HW News Marathi
देश / विदेश

Breaking News | दिल्लीमध्ये तीन मजली इमारत कोसळली

नवी दिल्ली | दिल्ली येथील अशोक विहार परिसरातील तीन मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या इमारतीत आतापर्यंत सात जण जखमी झाल्याची माहिती मिळाली. या जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. तसेच अग्निशमन दल, पोलीस आणि एनडीआरएफचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरू आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Republic Day | पहिले चार प्रजासत्ताक दिन इथे साजरे झाले

News Desk

Section 377 | एलजीबीटी समुदायाची ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक

News Desk

वादग्रस्त कृषी कायद्यांना तूर्तास स्थगिती देण्याबद्दल सरकारने विचार करावा, सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला

News Desk
महाराष्ट्र

कुपोषणावर मात करण्यासाठी ‘टिस’ या संस्थेची नियुक्ती करणार !

News Desk

मुंबई | दुर्गम भागातील मुलांचा कुपोषणामुळे होणाऱ्या मृत्यूला आळा घालण्यास राज्य सरकार अपयशी ठरलं आहे. त्यामुळे आता कुपोषणावर मात करण्यासाठी ‘टिस’ या संस्थेची नियुक्ती करणार आहेत. ही संस्था या परिसरात कशा प्रकारचे वैद्यकिय कार्य करणार आहे. तसेच कोणत्या पायाभुत सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत, डॉक्‍टरांचा ताफा किती असावा याचा शास्त्रोक्त अभ्यास करून उपाययोजना सुचवेल, अशी माहिती राज्य सरकारने न्यायालयात दिली आहे.

मेळघाटसह राज्यातील अन्य आदिवासी भागांत कुपोषणामुळे मृत्यू व आजाराचे प्रमाण वाढल्याच्या गंभीर वस्तुस्थितीकडे लक्ष वेधणार्‍या विविध जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. त्या याचिकेवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती एम.एस. सोनक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाच्या आदेशानुसार सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी न्यायालयात हजेरी लावून मेळघाटातील कुपोषणाची महिती न्यायालयाला दिली. राज्य सरकारकडून तातडीने 2 स्रीरोगतज्ज्ञांची तर 3 बालरोगतज्ञांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सांगितली.

यावेळी न्यायालयाने मेळघाटातील नवजात बालकांइतकचं गरोदर महिलांचं कुपोषणदेखील रोखणं अत्यावश्यक आहे असे मत न्यायालयाने व्यक्त करताना त्या संदर्भात काही विचार केला आहे का ? अशी विचारणाही बक्षी यांच्याकडे केली. तसेच मेळघाट परीसरात पॅथॅलॉजी लॅब्स किती आहेत . त्यांच्याकडून अहवाल किती तासात मिळतो, तिथे काम करणा-या डॉक्टरांना कोणत्या विशेष सवलती दिल्या जातात?, त्यांच्या राहण्याची नीट व्यवस्था आहे का? अश्या अनेक प्रश्नांची सरबत्तीच न्यायालयाने राज्य सरकारवर केली.

कुपोषण प्रश्न हा 40 टक्के सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांशी निगडीत आहे .हे अनेक अहवालांवरुन डघड झाले आहे. त्या अहवालाकउे कानडोळा करून चालणार नाही . त्या अहवालांकडे गांर्भीयाने पहा. युनिसेफचा अहवाल महत्वाचा असल्याने त्याचा अभ्यास करा . असे राज्य सरकारला बजावताना या प्रश्नावर अंतिम आदेश दिला जाईल. असे न्यायालयाने स्पष्ट करून याचिकेवर 25 ऑक्टांबर पासून अंतीम सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.

Related posts

दूध उत्पादक शेतक-यांच्या प्रश्नावर भाजपने स्वत:च्या विरोधात आंदोलन करावे – बाळासाहेब थोरात

News Desk

“पोहरादेवीची ‘पूजा’ तरी कशी पावेल, जर चव्हाणांच्या पूजाचं काय झाल ते सांगितलं नाहीत तर?” भाजपचा सवाल  

News Desk

मराठा आरक्षणावर सत्ताधारी आणि विरोधी एकत्र, राजकारण करणार नाही, फडणवीसांचे आश्वासन!

News Desk