HW News Marathi
देश / विदेश

वाहतूक व दळणवळणासाठीच्या अर्थसंकल्प २०२०-२१ मधील महत्त्वाच्या तरतूदी

नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (१ फेब्रुवारी) अर्थसंकल्प २०२०-२१ सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘सबका साथ, सबका विकास’, हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून हा अर्थसंकल्प सादर करण्यात आला. तसेच आतापर्यंत मांडलेल्या अर्थसंकल्पापैकी २०२०-२१ चा अर्थसंकल्प सगळ्यात मोठा होता शिवाय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेले भाषण हे त्यांच्या आतापर्यंतच्या भाषणांपेक्षा मोठे भाषण होते. २०२०-२१ च्या या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी, महिलांसाठी, अमुसुचित जाती-जमातींसाठी अनेक सोयी सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचेही दिसले. देशाची दळणवळण आणि वाहतूक सुधारण्यासाठी केलेल्या महत्त्वाच्या तरतूदी पुढीलप्रमाणे-

  • १०० लाख कोटी पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणार
  • उद्योग आणि व्यापार विस्तारासाठी 27,300 कोटींची तरतूद
  • इन्फ्रा पाईपलाईनच्या माध्यमातून 6500 प्रोजेक्टस करणार
  • रेल्वेच्या जमिनीवर सोलार पॉवर प्लांन्ट उभारले जातील.
  • 27,000 किलोमीटर रेल्वे ट्रॅकचे इलेक्ट्रिफिकेशन
  • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रोजेक्टला चालना
  • दिल्ली – मुंबई एक्स्प्रेस वे 2023 पर्यंत पूर्ण होणार
  • चेन्नई – बंगळुरू एक्स्प्रेस-वे लवकरच सुरू होणार
  • तेजस ट्रेनद्वारे पर्यटन स्थळे जोडणार
  • PPP च्या माध्यमातून 150 नवीन ट्रेन्स येणार
  • 2024 पर्यंत 100 नवीन विमानतळ बांधणार
  • वाहतूक पायाभूत सुविधांसाठी १.७० लाख
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभेत भाजप आमदाराने सॅनिटायझर पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

News Desk

ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या सुरक्षेत वाढ, पुरोगामी विचारवंतांच्या सुरक्षेत केली वाढ

News Desk

पीटीआयचे सत्ता स्थपानेसाठी १५८ इतके संख्याबळ

swarit