HW News Marathi
देश / विदेश

निर्मला सीतारमण यांनी अर्ध्यावरच भाषण का थांबवले ?

नवी दिल्ली | अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज (१ फेब्रुवारी) २०२०-२१ या वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला. यात मोदी सरकारने शेतकऱ्याच्या विकासासाठी खास भर दिला आहे. शिवाय देशातील बेरोजगारी मिटवण्यासाठीही काही खास तरतूदी करण्यात आल्या आहेत. शिवाय शिक्षणावर प्रामुख्याने ग्रामीण शिक्षणावर भर दिला आहे. मात्र, अर्थसंकल्पाचे वाचन करत असताना मध्येच सीतारामन यांची तब्येत बिघडली. दरम्यान हे सगळे लक्षात आल्यानंतर अर्थमंत्री सीतारामन यांना बसण्यास सांगण्यात आले. अर्थमंत्र्यांचे भाषण सुरू असताना त्यांचा रक्तदाब कमी झाला होता असे वृत्त पीटीआयने दिले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला हा त्यांचा मोदी सरकारचा आजचा दुसरा अर्थसंकल्प होता. आश्चर्याची बाब म्हणजे निर्मला सीतारमण यांनी केलेले आजचे भाषण हे त्यांच्या आतापर्यंतच्या भाषणांहून मोठे भाषण होते. याबरोबरच, त्यांचे आजचे भाषण हे त्यांनी या पूर्वी केलेल्या भाषणाहून मोठे होते. मात्र, तब्येत बिघडल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपले भाषण मध्यांतरावरच भाषण थांबवले. गेल्या वर्षी निर्मला सीतारामन यांनी दोन तास, १७ मिनिटे भाषण केले. यंदा त्यांनी आपले भाषण २ तास ४१ मिनिटांवर थांबवले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आज नॅशनल फूड डे, भारताचा राष्ट्रीय अन्नपदार्थ कोणता ?

Gauri Tilekar

अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाला ‘या’ विरोधी पक्षांचा बहिष्कार

Aprna

#CoronaVirus : देशात रुग्णांचा आकडा १९९ वर, तर राज्यात रुग्णांची संख्या स्थिर

swarit