HW News Marathi
देश / विदेश

आजपासून संसदेच्या अर्थसंकल्प अधिवेशनाचे दुसरे सत्र सुरू

नवी दिल्ली | संसदेचे अर्थसंकल्पी अधिवेशनाचे दुसरे सत्र आज (२ मार्च) सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर संसदेत विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अधिवेशनात विरोधकांच्या रेडारवर केंद्र गृहमंत्री अमित शहा असणार आहे. दिल्ली हिंसाचारात ४२ लोक ठार झाले आणि सुमारे ३५० लोक जखमी झाले. याप्रकरणी विरोधक भाजपप्रणीत केंद्र सरकारला तसेच दिल्ली पोलिसांवर जोरदार हल्लाबोल करण्याची शक्यता आहे.

तसेच भाजपचे नेता कपिल मिश्रा, अनुराग ठाकूर आणि प्रवेश वर्मा यांच्या चिथावणीखोर वक्तव्यामुळे दिल्लीत हिंसाचार उसळला. या भाजप नेत्यांवर एफआयआर का?, दाखल केली नाही. दिल्ली हिंसाचार प्रकरणावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीश एस. मुरलीधर यांची रातोरात बदली या मुद्द्यावर संसदेचे आजचे दिवस विरोधक मोद सरकारला धारेवर धरण्याची शक्तवता आहे.

ईशान्य दिल्लीतील काही भागांत हिंसाचार रोखण्यात केंद्र आणि दिल्ली सरकार अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. दिल्ली हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी अमित शहा यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. यासाठी सोनिय गांधी या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. तसेच शनिवारी (२९ फेब्रुवारी) सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी एक बैठक घेण्यात आली असून यात दिल्लीतील हिंसाचाराबाबत संसदेत सरकारच्या बाजू मांडण्याच्या पक्षाच्या रणनीतीवर चर्चा झाल्याचे म्हटले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतात कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींना DCGIची मंजुरी

News Desk

निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले होते !

News Desk

शहिद जवानांच्या मृतदेहाची विटंबना

News Desk