HW News Marathi
देश / विदेश

सीबीएसई बोर्डाचा १२ वीचा निकाल जाहीर, ८८.७८ % विद्यार्थी उत्तीर्ण

नवी दिल्ली | कोरोनाच्या संकट काळात विद्यार्थ्यांचे रखडलेले निकाल आता जाहीर करण्यास सुरुवात झाली आहे.केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेण्यात आलेल्या बारावीच्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे.

सीबीएसई बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार यंदा ८८.७८ टक्के विद्यार्थांनी बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत.

त्रिवेंद्रम, बंगळुरू आणि चेन्नईने यंदा चांगली कामगिरी केली आहे. दिल्ली झोनमधील ९४.३९ टक्के विद्यार्थाी पास झाले आहेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील मुलींनी बाजी मारली असून सीबीएसई बोर्डात ९२.१५ टक्के मुली पास झाल्या आहेत. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यंदा दहावी आणि बारावीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार नाही. मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी देखील विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

 

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गांधी घराणाच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या नेत्यांना लाज वाटली पाहिजे – सुनील केदार 

News Desk

महात्मा गांधींविषयी वादग्रस्त वक्तव्य करणारा कालीचरण महाराज पुणे पोलिसांच्या ताब्यात

Aprna

प्रताप सरनाईकांच्या पत्रानंतर महाविकास आघाडीची बैठक, एकनाथ शिंदेंनी बैठकीनंतर दिली ‘ही’ माहिती

News Desk