HW News Marathi
देश / विदेश

चीनला भारताच्या साखरेचा गोडवा

नवी दिल्ली । भारताकडून चीनला २० लाख टन कच्ची साखर जानेवारी महिन्यात निर्यात होणार आहे. दोन देशांदरम्यानची व्यापारी तूट भरून काढण्यासाठीचा हा एक प्रयत्न आहे. वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत भारतीय शुगर मिल्स असोसिएशन आणि चीन सरकार यांच्यामध्ये याबाबत करार करण्यात आला आहे.

वाणिज्य विभागाचे प्रतिनिधी मंडळ गेले दोन दिवस चीनमध्ये होते. त्यावेळी हा करार झाला आहे. चीनच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातले ऊस उत्पादक आणि साखर कारखान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. साखर उद्योगाकडून या कराराचे जोरदार स्वागत केले आहे. साखरेचे दर स्थिर राहावेत यासाठी केंद्र सरकारला एकूण पन्नास लाख टन साखर निर्यात करायची आहे. त्यापैकी वीस लाख टन साखर चीन खरेदी करत आहे. कच्च्या साखरेच्या निर्यातीमुळे पांढऱ्या साखरेचे उत्पादन कमी होईल बाजारात साखरेचे दर स्थिर राहतील.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#AeroIndia2019 : ‘एरोइंडिया’च्या शो दरम्यान कार पार्किंगला भीषण आग

News Desk

देशात पहिल्यांदच केली जाणार ‘श्रमगणना’

News Desk

अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमचं ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ नामकरण

News Desk