HW News Marathi
देश / विदेश

देशात अतिवृष्टीमुळे नागरीकांचे हाल

नवी दिल्ली | यंदाच्या पावसाळ्यात सात राज्यांत निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे तब्बल ७७४ जणांचा मृत्यु झाल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. गृहमंत्रालयाच्या राष्ट्रीय आणीबाणी प्रतिसाद केंद्राच्या (एनईआरसी) मते, केरळमध्ये १८७ जणांनी तर, उत्तर प्रदेशमध्ये १७१, पश्चिम बंगालमध्ये १७० आणि महाराष्ट्रात १३९ जणांनी यंदाच्या पावसाळ्यात पूर्वपरिस्थितीमुळे आपला जीव गमावला आहे. तसेच गुजरातमध्ये ५१, आसाममध्ये ४५ तर नागालँडमध्ये ८ जणांनी आपला जीव गमावला आहे.

केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये एकूण २७ नागरीक अजून बेपत्ता आहेत, तर राज्यात एकूण २४५ जण जखमी आहेत. महारष्ट्रातील एकूण २६ , तर केरळमधील १४, उत्तर प्रदेशमधील १२, आसाममधील २३, पश्चिम बंगालमधील २२, नागालँडमध्ये ११ तर गुजरातमधील १० जिल्ह्यांना यंदाच्या अतिवृष्टीचा आणि महापुराचा तडाखा बसला आहे. लॉंगढांगमध्ये रात्री उशिरा पडलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे उत्तराखंडमधील बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्ग रात्रीपासून बंद करण्यात आला असून स्थानिक प्रशासनाद्वारे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम चालू झाले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

फ्रान्समधील हल्ल्यानंतर धर्माच्या नावाखाली अधर्मी कृत्ये करणाऱ्यांना सामनातून सुनावले खडे बोल

News Desk

जुलैपासून मोबाईल नंबर होणार 13 अंकी

Adil