HW News Marathi
देश / विदेश

शबरीमाला निर्णयाच्या निषेधार्थ केरळ बंद

तिरुवनंतपुरम । केरळच्या शबरीमाला डोंगरावरील सुप्रसिद्ध अयप्पा मंदिरामचे दरवाजे महिलांसाठी प्रवेश खुला करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निषेधार्थ गुरुवारी शबरीमाला संरक्षत समिती आणि विविध हिंदू संघटनांनी केरळमध्ये बंद पुकारला होता. या बंदामुळे बस आणि रिक्षा सेवा ठप्प झाल्या होत्या. काही ठिकाणी राज्य परिवहन मंडळाच्या बसेसवर दगडफेक झाल्याच्या घटना घडल्या आहेत.

शबरीमालाकडे जाणा-या निलक्कल आदी मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच राज्य सरकारने निदर्शने आणि हिंसाचार रोखण्यासाठी सन्निधनम, पाम्बा यासह चार ठिकाणी जमावबंदी लागू करण्यात आली होती.तसेच पोलिसांनी निलक्कल येथे बुधवारी अयप्पा भक्तांवर लाठीमाराच्या निषेधार्थ शबरीमाला संरक्षत समितीने पुकारलेल्या बंदला आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया, भाजप आणि एनडीएतील घटक पक्षांनी पाठिंबा दर्शविला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

केरळ विमान दुर्घटना कशी घडली ? प्रत्यक्षदर्शींनी नेमकं काय पाहिले ?

News Desk

राष्ट्रपतींनी केले मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन

News Desk

तीन तलाक विधेयकाला केंद्र सरकारची मंजुरी

News Desk
मनोरंजन

लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी जाणार असाल तर सावधान !

News Desk

मुंबई । महाराष्ट्रात गणेशोत्सव जल्लोषात साजरा होत आहे. गणेश भक्त लालबागच्य२ राजाच्या दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करत आहेत. या गर्दीचा फायदा घेऊन पाकीट मारणची चांगलीच चंगळ झाली आहे. लालबाग परिसरात अन्य ठिकठिकाणी गणपती बाप्पा मंडळात विराजमान होऊन चार दिवस उलटले आहे. परंतु याच गर्दीचा फायदा घेऊन चोरटे गणेश भक्तांच्या पाकीटावर हात सफाई करत होते.

तसेच लालबाग परिसरातील काळाचौकी पोलीस ठाण्यात गेल्या चार दिवसांपासून जवळपास १३५ मोबाईल चोरीच्या तक्रारीची नोंद करण्यात आली. मोबाईलच्या तक्रारी नोंदवताना पोलिसांची चांगलीच दमछाक होताना दिसत आहे. मोबाईल चोरीच्या सर्वात जास्त तक्रारी या लालबागचा राजा परिसरात घडत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुंबईतील गणेशोत्सवात लालबाग आणि परळ भागातून गणपती पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने भाविक गर्दी करतात. या गणेश भक्तांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त आणि सीसीटीव्ही कॅमे-यांची सोय केली असून यांच्या आधारे या पाकीट मारांचा पोलीस शोध घेत आहेत. गतवर्षी देखील गणेशोत्सवाच्या काळात पाकीट मार भुरट्या चोरींचा सुळसुळाट होता. तेव्हा पोलिसांनी दोन चो-यांच्या टोळ्या सुरत गॅग आणि यूपी गॅग आशी या दोन्ही टोळीची नावे होती.

Related posts

Gandhi Jayanti : राष्ट्रवादीच्या नेत्यांना पाहून विनोद तावडेंचा ‘आवाज’ चढला

swarit

Kargil Vijay Diwas : थोडक्यात जाणून घ्या…’कारगिल’विषयी

News Desk

FLASHBACK 2018 : सहा महिलांची ‘नाविका सागर परिक्रमा’

News Desk