HW News Marathi
देश / विदेश

‘असा’ असेल कमांडर अभिनंदन यांचा भारतात परतण्याचा प्रवास

नवी दिल्ली | पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायू दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांची आज (१ मार्च) अखेर मुक्तता करण्यात येणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी (२८ फेब्रुवारी) पाकिस्तानच्या संसदेत केली आहे. कमांडर अभिनंदन हे वाघा बॉर्डरवरून आपल्या मायभूमीत परतणार आहेत. कमांडर अभिनंदन हे पाकिस्तानच्या ताब्यात असल्याचे समजताच तातडीने त्यांच्या सुटकेसाठी भारताकडून प्रयत्न सुरू झाले. संपूर्ण देशभरातून देखील केवळ त्यांच्या सुखरूप सुटकेसाठीच प्रार्थना केली जात होती.

कमांडर अभिनंदन यांचा भारतात परतण्याचा प्रवास

कमांडर अभिनंदन यांची मायदेशी परारण्याची वेळ अद्याप निश्चित झालेली नसली तरी अभिनंदन यांना दुपारपर्यंत भारतात सुखरूप पाठवावे, अशी मागणी भारताकडून केली जात आहे. दुपारी १२ ते १ वाजेपर्यंत कमांडर अभिनंदन भारतात परततील असे म्हटले जात आहे. कमांडर अभिनंदन यांना आज दुपारी विमानाने लाहोरला आणण्यात येईल. त्यानंतर वाघा बॉर्डरवरून त्यांना भारतात पाठविण्यात येईल, अशी माहिती मिळत आहे. तेथील भारतीय वायू दलाच्या ताफ्यासह अभिनंदन त्यांना अमृतसर एअर बेसला आणण्यात येईल. तेथील ते दिल्लीसाठी रवाना होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

खेळाडू, कलाकारांनी केला कठुआ बलात्काराचा निषेध

News Desk

वुहानमध्ये पुन्हा कोरोचा रुग्णांमध्ये वाढ! वाढली देशवासीयांची चिंता

News Desk

मलिकार्जुन खरगेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजप आक्रमक

Darrell Miranda