HW News Marathi
देश / विदेश

हिंदू-मुस्लिम एकत्र आल्याशिवाय देश मजबूत होणार नाही- रामदास आठवले

नवी दिल्ली |डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या आदर्श संविधानातील भारत उभा करण्यासाठी हिंदू आणि मुस्लिमांनी एकत्र आले पाहिजे. बंगालचा उपसागर, अरबी समुद्र आणि हिंदी महासागर या तिन्ही महासागरांचे पाणी जसे एकत्र येते तसेच हिंदू मुस्लिमांनी एकत्र आले पाहिजे. हिंदू मुस्लीम ऐक्याशिवाय देश मजबूत होणार नाही,” असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

नवी दिल्ली येथील कॉन्स्टिट्युशनल क्लब हॉलमध्ये लेखक इरफान शेख यांनी लिहिलेल्या योगी आदित्यनाथ आणि मुसलमान या पुस्तकाचे प्रकाशन रामदास आठवले यांच्या हस्ते आज करण्यात आले आहे. यावेळी आचार्य शैलेश तिवारी,भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुदेश वर्मा, पत्रकार मोहम्मद आझाद आदी मान्यवर उपस्थित होते.

संविधान देशात सर्वश्रेष्ठ आहे. संविधानाने दिलेल्या मार्गानेच आपण वाटचाल केली पाहिजे. राष्ट्रीय एकात्मता आणि बंधुत्त्वाची भावना वाढावी, असे आवाहन रामदास आठवले यांनी केले आहे. पुस्तकाचे लेखक इरफान शेख यांनी यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल गैरसमज पसरविले जात असून त्यांचा मुस्लिमांना विरोध नाही. योगी आदित्यनाथ हिंदू आहेत मात्र ते मुस्लिमांचा द्वेष करीत नाहीत. मुस्लिम आणि योगी आदित्यनाथ यांच्यातील गैरसमज आणि दुरावा मिटण्यास हे पुस्तक उपयोगी पडेल, असे या पुस्तकाचे लेखक इरफान शेख म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सीबीआय प्रकरणी ट्विट केल्यामुळे प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

News Desk

उत्तर भारतात पुन्हा वादळाचा फटका, ४१ जणांचा बळी

News Desk

पाकिस्तानी विमानतळांची उड्डाणे तातडीने बंद

News Desk