HW News Marathi
देश / विदेश

BCCI ने भारतीय खेळाडुंचे तब्बल १० महिन्यांचे मानधन थकवले

मुंबई |भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने BCCI भारतीय खेळाडुंचे तब्बल १० महिन्यांचे मानधन थकवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. बीसीसीआयसोबत करारबद्ध असलेल्या २७ खेळाडुंना प्रत्येक तीन महिन्यात श्रेणीनुसार मानधन दिले जाते. मात्र, २०१९ च्या ऑक्टोबर महिन्यापासून या सर्व खेळाडुंना पगार आणि सामना शुल्क दिलेच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, सध्याच्या घडीला BCCI च्या बँक खात्यांमध्ये जवळपास ५०२६ कोटी रुपये आहेत. तरीही BCCI ने खेळाडुंचे मानधन दिलेले नाही. असे असताना देखील पगार का थकवले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तसेच, पगारासोबत भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंना सामना शुल्कदेखील मिळाले नाही आहे. डिसेंबर २०१९ पासून भारतीय क्रिकेट संघ २ कसोटी, ९ एकदिवसीय आणि ८ टी-२० सामने खेळला आहे. मात्र बीसीसीआयने अद्याप या सामन्यांचे शुल्क आणि या कालावधीतील पगार खेळाडूंना दिलेला नाही. इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने याबद्दलची बातमी दिली आहे. बीसीसीआयने खेळाडूंना द्यायची रक्कम साधारण ९९ कोटी रुपये इतकी बाकी आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भारतातील ‘या’ राज्यात आढळला कोरोना व्हायरसचा दुसरा रुग्ण

News Desk

राम मंदिर भूमिपूजनाचे पहिले निमंत्रण मुस्लिम पक्षकार इक्बाल अंसारींना दिले

News Desk

५ एकर जमिनीची भीक नको | असदुद्दीन ओवेसी

News Desk