HW News Marathi
देश / विदेश

उद्धव ठाकरे काही बॉलिवूड माफियांच्या दबावात, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांचा गंभीर आरोप

मुंबई | सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणावरून राजकारण पेटले आहे. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात काही महत्त्वाच्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे”, असा गंभीर आरोप बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी केला आहे. त्याचप्रमाणे, “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही बॉलिवूड माफियांच्या दबावात आहेत. ज्यात काँग्रेस त्यांचे संरक्षण करत आहे. आता काँग्रेस बिहारच्या जनतेला काय तोंड दाखवणार ?”, असाही खळबळजनक दावा सुशील मोदी यांनी केला आहे.

“सुशांतच्या वडिलांची इच्छा असेल तर आम्ही ह्या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीसाठी शिफारस करू”, असे आश्वासनही मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दिले आहे. उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी शुक्रवारी (३१ जुलै) एक ट्विट केले होते. आपल्या ट्विटमध्ये ते म्हणतात की, “बिहार पोलीस अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी करत आहे. मात्र, त्यात मुंबई पोलीस अडथळा निर्माण करत आहेत. मुंबई पोलीस या प्रकरणात बिहार पोलिसांना कोणतेही सहकार्य करत नाही. त्याचप्रमाणे, हे प्रकरण सीबीआयने सांभाळावे अशी भाजपची मागणी आहे.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“राहुल गांधींना लोकसभेतून वर्षभरासाठी निलंबित करा”- रामदास आठवले

News Desk

अण्णांचे उपोषण या प्रश्नांची उत्तरे देईल काय ?

News Desk

नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे दोघांमध्येही जनतेला भविष्य दिसत नाही, मनसेचा टोला

News Desk