HW News Marathi
देश / विदेश

21 नावाने दाऊदचा जगभर वावर

नवी दिल्ली-अंडरवल्ड दाऊद इब्राहिम चक्क 21 नावे वापरून जगाला गुमराह करत असल्याची माहीती आहे. अब्दुल शेख इस्माल, अब्दुल अझीझ अब्दुल हमीद, अब्दुल रहमान शेख मुहम्मद इस्माइल, अनीस इब्राहिम शेख मुहम्मद, बडा भाई, दाऊद भाई, इकबाल भाई, दिलीप अझीझ, दाऊद इब्राहिम, फारुखी शेख, हसन कासकर दाऊद, हसन दाऊद, इब्राहिम अनीस, इब्राहिम दाऊद हसन शेख, कासकर दाऊद हसन शेख इब्राहिम, कासकर दाऊद इब्राहिम मेनन, कासकर दाऊद हसन इब्राहिम, मेनन दाऊद इब्राहिम, सबरी दाऊद, साहब हाजी आणि बडा शेठ, अशी त्याची नावे असून त्याने याच नावाने जगभर आपल्या उद्योग वाढवलेला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातील जनतेला, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून शुभेच्छा

News Desk

नोटाबंदीचा निर्णय हा जनतेसाठी धक्का नव्हता, आम्ही जनतेला सावध केले होते !

News Desk

संभाजीराजे आणि शरद पवारांमध्ये १५ मिनिटे चर्चा ! भेटीत नेमके काय घडले ?

News Desk
Uncategorized

आता घाटी रुग्णालयात तीन बालकांचा मृत्यू

News Desk

औरंगाबाद-येथील घाटी रुग्णलायतील प्रसूती विभागात रविवारी रात्री तीन बालकांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी नातेवाईकांना गोरखपूर घटनेची आठवण झाली. मृत बेगमपुरा स्मशानभूमीत सोमवारी सकाळी सहा वाजता एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ही विदारक घटना पाहून रोज सरणाची व्यवस्था करणाऱ्या स्मशानजोगीच्याही डोळ्यात पाणी आले.

रविवारी मृत्युमुखी पडलेल्या तीन बालकांत दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. माया मुकेश मगरे (३०, रा. ब्रिजवाडी), पूजा पांडुरंग बखले (रा. डोंगरगाव, ता. अंबड), अर्चना विनायक मुंढे (३०, रा. धावणी मोहल्ला) अशी मृत्युमुखी पडलेल्या नवजात शिशूंच्या आईची नावे आहेत. विनायक मुंढे (३६) त्याची पत्नी अर्चना हिला रविवारी सातच्या सुमारास अचानक कळा येऊ लागल्या. त्याने तिला तत्काळ घाटीतील प्रसूती विभागात दाखल केले. सात वाजून ४० मिनिटांनी अर्चना प्रसूत झाली. मात्र मुलगा झाला आहे की मुलगी हे त्याला कोणीच सांगितले नाही. पुरुषांना प्रसूती विभागात प्रवेश नसल्यामुळे त्याला बाहेरच थांबावे लागले. अखेर सकाळी सहा वाजता विनायकच्या हातात मृत बाळ ठेवण्यात आले. माझ्या बाळाचा मृत्यू कशामुळे झाला? असे तो घाटीतील कर्मचाऱ्यांना विचारत होता. मात्र, त्याला उत्तर मिळाले नाही. काही मुले जन्मल्यानंतर केवळ पंधार मिनिटे जगतात, असे डॉक्टरांनी सांगितले.

Related posts

Aprna

देशात भाजपचे सरकार आल्यानंतर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया

News Desk

नाशिकमध्ये २०० नोटांची छपाई पूर्ण

News Desk