HW News Marathi
देश / विदेश

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे १६७ जणांचा मृत्यू

तिरुअनंतपुरम | केरळमध्ये मुसळधार पावसाने येथील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १६७ जणांचा मृत्यू झाला असून ८ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. लाखोच्या संख्येने नागरिक बेघर झाले आहेत. एनडीआरएफच्या पाटी टीम तिरुअनंतपुरमध्ये दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफच्या टीमकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

मुसळधार पावसामुळे बस आणि रेल्वे फटका बसला आहे. पेरियार नदीवरील धरण अतिवृष्टीमुळे ओव्हरफ्लो झाल्याने पाणी विमानतळाच्या धावपट्टीवर आले आहे. त्यामुळे कोची येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सेवा शनिवार, १८ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांचे मदतीचे आवाहन

केरळमधील पथनमतित्ता जिल्ह्यातील रन्नी, अरनमुला, कोझेनचेरी गावांतील लोक मुसळधार पावसामुळे घरातच अडकून पडली आहेत. पथनमतित्ता, एर्नाकुलम आणि थरिस्सूर जिल्ह्यांतील अनेक भागात पाण्याची पातळी 20 फुटांहून अधिक आहे. त्यामुळे गल्लीबोळाला नद्यांचे स्वरूप आले आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य केंद्रीय मंत्र्यांकडे जास्तीची मदत मागितली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कश्मीरमध्ये १३ दहशतवाद्यांना कंठस्नान, ३ जवान शहीद

News Desk

‘स्वातंत्र्याची जाणीव करून देणं हे देश उलथवून टाकणं झालं आहे का?’, राऊत मोदी सरकारवर संतापले

News Desk

‘उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीत काय घडलं?’ संजय राऊत म्हणाले….

News Desk
मुंबई

झगमगणाऱ्या ‘सीएसएमटी’ स्थानकाची वाजपेयींना श्रद्धांजली

News Desk

मुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी यांचे आज दिर्घ आजाराने निधन झाले. वाजपेयी केवळ राजकारणा पुरतेच मर्यादित नव्हते तर कवी मनाचे लेखक म्हणून देखील त्यांची जनमाणसात वेगळी ओळख होती. वाजपेयींच्या निधनाने देश शोकसागरात बुडाला आहे.

आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनानंतर देशात सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. देशभरातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येत आहे. अशातच नेहमी उजेडात झगमगणारे मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलच्या इमारतीत काल रात्री शांत पाहायला मिळाली.

अटल बिहारी वाजपेयींना श्रद्धांजली देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ऐतिहासिक वारसा असलेल्या ‘सीएसएमटी’ स्थानकाच्या इमारतीवरचा झगमगाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गुरुवारी रात्री ‘सीएसएमटी’च्या इमारतीचे दिवे मालवून शांत ठेवण्यात आली होती. त्यामुळे रात्रीच्या वेळी दिव्यांच्या प्रकाशात आपल्या वेगळ्याच सौंदर्याने खुलून दिसणारी ही इमारत गुरुवारी निस्तेज झाली होती.

Related posts

‘कोण करणार आमच्या घरांचे रक्षण?’, अंधेरीच्या पोलीस कुटुंबीयांचा सरकारला सवाल

Chetan Kirdat

“जिथे विषय गंभीर, तिथे राज साहेब खंबीर”…! राज ठाकरे १३ तारखेला रत्नागिरीच्या दौऱ्यावर

Adil

इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा विजय असो | राज ठाकरेंची टिप्पणी

News Desk