HW News Marathi
देश / विदेश

केरळमध्ये मुसळधार पावसामुळे १६७ जणांचा मृत्यू

तिरुअनंतपुरम | केरळमध्ये मुसळधार पावसाने येथील दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १६७ जणांचा मृत्यू झाला असून ८ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. लाखोच्या संख्येने नागरिक बेघर झाले आहेत. एनडीआरएफच्या पाटी टीम तिरुअनंतपुरमध्ये दाखल झाल्या आहेत. एनडीआरएफच्या टीमकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

मुसळधार पावसामुळे बस आणि रेल्वे फटका बसला आहे. पेरियार नदीवरील धरण अतिवृष्टीमुळे ओव्हरफ्लो झाल्याने पाणी विमानतळाच्या धावपट्टीवर आले आहे. त्यामुळे कोची येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सेवा शनिवार, १८ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे.

मुख्यमंत्र्यांचे मदतीचे आवाहन

केरळमधील पथनमतित्ता जिल्ह्यातील रन्नी, अरनमुला, कोझेनचेरी गावांतील लोक मुसळधार पावसामुळे घरातच अडकून पडली आहेत. पथनमतित्ता, एर्नाकुलम आणि थरिस्सूर जिल्ह्यांतील अनेक भागात पाण्याची पातळी 20 फुटांहून अधिक आहे. त्यामुळे गल्लीबोळाला नद्यांचे स्वरूप आले आहे. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अन्य केंद्रीय मंत्र्यांकडे जास्तीची मदत मागितली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#CoronaVirus | राज्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ४२३

News Desk

न्यूज क्लिकच्या कार्यालयावर ईडीचा छापा

News Desk

एडीआर रिपोर्टनुसार भाजपच्या २२४ पैकी ८३ उमेदवारांवर गुन्हे दाखल

swarit