HW News Marathi
देश / विदेश

आज ठरणार दिल्लीत कोणाची सत्ता येणार?

नवी दिल्ली | दिल्ली विधानसभेची निवडणूक शनिवारी (८ फेब्रुवारी) पार पडली होती. यानंतर आज (११ फेब्रुवारी) दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. दिल्लीच्या गादीवर आप, भाजप आणि कॉंग्रेस यापैकी कोण विराजमान होईल हे आज समजणार आहे. दिल्ली विधानसभेसाठी ६२.५९ टक्के मतदान झाल्याची घोषणा निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत केली. मात्र, आयोगाने जाहीर केलेल्या मतदानाच्या टक्केवारीत तफावत असल्याचा आरोप आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी पत्रकार परिषदेतून केला.

दरम्यान, अरविंद केजरीवाल म्हणाले की, मतदानाच्या रात्री उशिरापर्यंत ईव्हीएम मशीन येत होत्या. पोलिंग स्टेशनवरून आलेला डेटा सिस्टममध्ये टाकला जात होता. त्यामुळे विलंब झाल्याची माहिती आयोगाच्या अधिकाऱ्यांनी दिली. २०१५ च्या विधानसभा निवडणुकीत ६७.४७ टक्के मतदान झाले होते. याचाच अर्थ २०२०च्या या निवडणूकीत ५ टक्के मतदान कमी झाले आहे. दिल्ली विधानसभेसाठी झालेल्या मतदाची टक्केवारी घोषित न केल्याने आपकडून आक्षेप घेतल्यानंतर भाजपकडून मात्र आपवर टीकासत्र सुरु झाले. भाजपचे अध्यक्ष मनोज तिवारी यांनी, आपवाले उगाच त्रास करुन घेत असल्याचे म्हटले.

एक्झिट पोल आपच्या बाजूने

दिल्लीतील एकूण ७० विधानसभा जागांपैकी आम आदमी पार्टीला ५१ ते ६५ जागा मिळू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर भाजपच्या खात्यात ३ ते १७ जागा तर काँग्रेसला ० ते ३ जागा मिळू शकतात असाही अंदाज लावण्यात येत आहे. एकूण सरासरी पाहता आपला ५८, भाजपला १० आणि काँग्रेसला २ जागा मिळू शकतात अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. आता पुन्हा एकदा दिल्लीत आपचेच सरकार येणार का याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

व्हेनेझुएलाच्या राष्ट्रपतींवर ड्रोन हल्ला

swarit

छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यात ८ नक्षलवाद्यांचा खात्मा

News Desk

ते आता पप्पू राहिले नाहीत, गाढवांचे सम्राट झाले आहेत !

News Desk