HW News Marathi
देश / विदेश

महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब पाठोपाठ दिल्लीही ‘लॉकडाऊन’ 

नवी दिल्ली | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव अनेक शहरे, राज्य लॉकडाऊन करण्यास भाग पाडत आहे. आद (२२ मार्च) राजस्थान, पंजाब पाठोपाठ महाराष्ट्रही लॉकडाऊन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला. आता महाराष्ट्रा पाठोपाठ दिल्लीही लॉकडाऊन करण्याचा निर्णय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी घेतला आहे. कोरोनामूळे ७५ जिल्ह्यांत बंद घोषित करण्यात आला आहे. दिल्लीत २३ ते ३१ मार्च लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. शहरातील अत्यावशक सेवा सोडून संपूर्ण राज्य बंद राहणार आहे. तसेच, दिल्लीतील मेट्रो सेवाही ३१ मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे.

भारतात कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा ३४५ वर पोहोचला आहे. दरम्यान, हे जागतिक संकट लवकर दुर व्हावे यासाठी राज्य आणि केद्र सरकार अथक प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना आपण सहकार्य करायला हवे आहे. दिल्लीतही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. दरम्यान, गरज पडल्यास दिल्लीतही लॉकडाऊन करावे लागतील असे संकेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी या आधी दिले होते. नागरिकांच्या सुरक्षेसाठी हे महत्त्वाचे आहे असेही त्यांनी म्हटले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘चांद्रयान-२’ चे यशस्वी उड्डाण हा भारताच्या तिरंग्याचा सन्मान !

News Desk

श्रीनगरमध्ये जवान-दहशतवाद्यांमध्ये चकमक, संतप्त जमावाकडून दगडफेक

News Desk

मराठमोळ्या श्रीकांत दातार यांची ‘हार्वर्ड बिझनेस स्कुल’च्या डीनपदी नियुक्ती, राज ठाकरेंची पोस्ट

News Desk