HW News Marathi
Covid-19

तर दिल्लीत ३१ जुलैपर्यंत ५ लाखांहून अधिक रुग्ण वाढू शकतात

नवी दिल्ली | दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. याच वाढत्या प्रादुर्भावावर आज ( ९ जून) उपराज्यपाल अनिल बैजल यांच्या नेतृत्वात डीडीएमएची बैठक झाली. या बैठकीला उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन उपस्थित होते. कोरोना रुग्णांची वाढ अशीच सुरु राहिली तर ३१ जुलैपर्यंत ५ लाखाहून अधिक कोरोना रुग्ण दिल्लीत वाढतील, अशी शंका सासोदिया यांनी व्यक्त केली.

‘दिल्लीतील रुग्णालये सर्व रूग्णांसाठी उघडण्याबाबतचा मुद्दा आम्ही बैठकीत उचलला. दिल्ली सरकारचा निर्णय का बदलण्यात आला याबाबत उपराज्यपालांना उत्तर देता आले नाही. ‘ एलजीच्या निर्णयामुळे दिल्लीकरांसमोर संकट उभे राहिले आहे. ज्या वेगाने संसर्ग वाढत आहे, असे दिसते आहे की ३० जून पर्यंत १५ हजार बेडची आवश्यकता लागेल. ३१ जुलै पर्यंत ८० हजार बेड्स लागतील. ३१ जुलै पर्यंत ५ लाखाहून अधिक रुग्णांची वाढ होऊ शकते.’ यावरच चर्चा करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन बैठकीनंतर उपराज्यपाल अनिल बैजल यांनी दुपारी तीन वाजता सर्वपक्षीय बैठक बोलविली आहे. या बैठकीत कोरोनाची सद्यस्थिती आणि ते रोखण्याच्या उपायांवर चर्चा केली जाणार आहे.

एलजी साहेबांच्या आदेशाने दिल्लीतील लोकांसाठी मोठी समस्या आणि आव्हान निर्माण केले आहे. कोरोना साथीच्या वेळी उपचार देणे हे देशभरातून आलेल्या लोकांसाठी एक मोठे आव्हान आहे. कदाचित आपण संपूर्ण देशाच्या लोकांची सेवा करावी अशी देवाची इच्छा आहे. आम्ही प्रत्येकाच्या उपचारांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धवजी मुख्यमंत्री होऊ नयेत, म्हणून देव पाण्यात ठेवून बसलेल्या काही लोकांबद्दल सहानुभूती !

News Desk

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी निमंत्रण नसेल तरीही राममंदिर भूमिपूजनाला जावं-संभाजी भिडे

News Desk

महाराष्ट्रात परतणाऱ्या प्रवाशांसाठी RT-PCR चाचणी निगेटिव्ह असणं बंधनकारक

News Desk