HW News Marathi
देश / विदेश

ताजमहालची निगा राखा नाही, तर पाडून टाका | सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली | ताजमहाल हे जगातील सात आश्चर्यंपैकी एक गणले जाते. सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश व केंद्र सरकारला ताजमहालच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून ताशेरे ओढले. ताजमहालची निगा राखता येत नसेल तर ते बंद करा, नाही तर पाडून टाका, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला सांगितले.

ताजमहालच्या संवर्धन संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला खडे बोल सुनावले. ताजमहाल पाहण्यासाठी लाखोच्या संख्येने पर्यटक येथे येतात. ताजमहालच्या संरक्षण आणि देखरेखी संदर्भात पुरात्त्व विभागच्या उदासीनतेवर सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेतला आहे.

ताजमहालच्या संवर्धनासाठी आतापर्यंत काय करण्यात आले, आणि कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत. याचा विस्तृत अहवाल देण्याचा आदेश खंडपीठाने केंद्र सरकारला दिले आहे. दरम्यान, ताजमहाल परिसरात होत असलेल्या प्रदूषणा संदर्भात आयआयटी कानपूरमधील संशोधक समिती काम करत असल्याचे केंद्राने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. ती समिती आपला अहवाल चार महिन्यात सादर करणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३१ जुलैला होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मायावतीची नवी राजकीय खेळी, काँग्रेस अडचणीत 

swarit

अरूण जेटली 11 वाजता अर्थसंकल्प सादर करणार

News Desk

माहीच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी !

News Desk