HW News Marathi
देश / विदेश

ताजमहालची निगा राखा नाही, तर पाडून टाका | सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली | ताजमहाल हे जगातील सात आश्चर्यंपैकी एक गणले जाते. सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश व केंद्र सरकारला ताजमहालच्या सुरक्षेच्या प्रश्नावरून ताशेरे ओढले. ताजमहालची निगा राखता येत नसेल तर ते बंद करा, नाही तर पाडून टाका, असे सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला सांगितले.

ताजमहालच्या संवर्धन संदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि उत्तर प्रदेश सरकारला खडे बोल सुनावले. ताजमहाल पाहण्यासाठी लाखोच्या संख्येने पर्यटक येथे येतात. ताजमहालच्या संरक्षण आणि देखरेखी संदर्भात पुरात्त्व विभागच्या उदासीनतेवर सर्वोच्च न्यायालयाने आक्षेप घेतला आहे.

ताजमहालच्या संवर्धनासाठी आतापर्यंत काय करण्यात आले, आणि कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत. याचा विस्तृत अहवाल देण्याचा आदेश खंडपीठाने केंद्र सरकारला दिले आहे. दरम्यान, ताजमहाल परिसरात होत असलेल्या प्रदूषणा संदर्भात आयआयटी कानपूरमधील संशोधक समिती काम करत असल्याचे केंद्राने सर्वोच्च न्यायालयात सांगितले. ती समिती आपला अहवाल चार महिन्यात सादर करणार आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३१ जुलैला होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जीएसटीचा सर्वसामन्यांना भूर्दंड, ग्राहकांच्या खिशाला कात्री

News Desk

न्यूज पोर्टल्ससाठी नवीन दारे उघडणार , एच डब्ल्यू न्यूज पोर्टल आणि साऊथ लाईव्ह न्यूज पोर्टल एकत्र

News Desk

नववारी साडी नेसून पार केली 42 किलोमीटरची स्पर्धा

News Desk
राजकारण

हे अपत्य जन्माला घालायला भाजपला ४ वर्षे लागली !

News Desk

मुंबई | “देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु, तेव्हापासून आजपर्यंत विधानसभेचे उपाध्यक्ष पद रिक्त ठेवण्यात आले होते. भाजप सरकार आलं आणि चौथं वर्षही संपलं म्हणजे भाजप-सेना सरकारला या अपत्याला जन्माला घालायला ४ वर्षे लागली”, अशी टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केली. विधानसभेच्या उपाध्यक्ष पदाची आज निवड करण्यात आली आहे. त्यावेळी उपाध्यक्ष विजय औटी यांचे अभिनंदन करताना अजित पवार यांनी भाजप सरकारच्या कारभारावर जोरदार टिका केली आहे.

“विजय औटी हे उपाध्यक्ष झाले याचा आम्हाला आनंदच आहे. त्यांना पहिल्यांदाच हे पद दयायला हवे होते. त्यामुळे अधिक आनंद झाला असता. विजयराव औटी हे मी जेव्हा राजकारणातही नव्हतो तेव्हा समाजवादी काँग्रेस पक्षाचे ते अध्यक्ष होते. अतिशय तळमळीचे कार्यकर्ते म्हणून त्यांना मी ओळखतो. ते अरुण मेहता, सुरेश कलमाडी यांच्यासोबत ते काम करत होते”, असेही अजित पवार यांनी म्हटले आहे.

“विजयराव औटी यांचे सर्वांशी जिव्हाळ्याचे संबंध आहे. हे कुटुंबच समाजाशी जुळलेले आहे. औटी हे जुने समाजवादी विचारांचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी अनेक सामाजिक कामे केली आहेत. त्यामुळे त्यांना ही संधी मिळाली याचा आनंद आहे”, असे म्हणत अजित पवार यांनी पक्षातर्फे विजय औटी यांचे अभिनंदन केले आहे.

Related posts

काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील भाजपच्या वाटेवर ?

News Desk

दाभोलकर-पानसरे हत्येप्रकरणी फटके मुख्यमंत्र्यांनाच का ?

News Desk

संविधान जाळणाऱ्या देशद्रोह्यांना अटक करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे राज्यभर आंदोलन

News Desk