HW News Marathi
देश / विदेश

दिल्लीतून उगम पावलेले हे ग्रहण कधी सुटणार ? | धनंजय मुंडे

मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सकाळी सूर्यग्रहण बघण्यासाठी आपण किती उत्सुक होतो, याची माहिती ट्विटर हँडलच्या माध्यमातून दिली. पण दिल्लीमध्ये ढग असल्यामुळे सूर्यग्रहण प्रत्यक्ष डोळ्यांनी बघता न आल्याबद्दल त्यांनी खंतही व्यक्त केली. काही ठिकाणी ढग असल्यामुळे तेथील नागरिकांना प्रत्यक्ष डोळ्यांनी हे ग्रहण बघता आले नाही. आज झालेले सूर्यग्रहण चालू वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण आहे. पंतप्रधान मोदी सुर्यग्रहण पाहत असलेल्या क्षणाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी नेते धनंजय मुंडे यांनी दिल्लीतून उगम पावलेले हे ग्रहण कधी सुटणार? असा सवाल केला आहे. धनंजय मुंडे यांनी सूर्यग्रहण सुटताच मोदी सरकारवर टीका करणारे ट्वीट केले आहे.

पंतप्रधान मोदींनी ट्वीट करून म्हटले की, भारतातील अनेक लोकांप्रमाणे मी देखील 2019 मधील अखेरचे सूर्यग्रहण पाहण्यासाठी उत्सुक होतो. पण मला ढगांमुळे सूर्य दिसला नाही. पण कोझीकोड आणि इतर भागातील ग्रहणाची दृश्ये लाइव्ह स्ट्रिमिंगवर पाहिली. तज्ज्ञांशी चर्चा करून याबद्दल माहिती देखील घेतली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#Lockdown2 : फ्रान्समधीलही लॉकडाऊन ११ मेपर्यंत वाढला, राष्ट्रपतींनी केली घोषणा

News Desk

#FightCorona | देशातील ऑटोमोबाइल कंपन्यांना व्हेंटीलेटर्स बनविण्याचे केंद्राचे आदेश

News Desk

सोमवारपासून जम्मू-काश्मीरमधील काही निर्बंध होणार शिथिल

News Desk